Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

गाव आहे चांगला !! पण रस्ता वेशीला टांगला !!!


* नवरगाव ते सगनापुर परिसरातील जनता म्हणते रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता ???

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]


सविस्तर वृत्त असे की.
मारेगाव  तालुक्यातील मौजा नवरगाव ते सगणापुर ह्या रस्त्याचे काम सुमारे 17 वर्षाचा आधी करण्यात आले होते.त्या नंतर या मार्गावर 2 वेळा तात्पुरती थातुर माथूर डागडुगी सार्वजनिक बांधकाम विभागा कडून करण्यात आली होती.पण अवघ्या काही दिवससात पितळ उघडे पडले आहे.

व त्या रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडलेले आहे. हे वास्तव्य आहे  रस्त्यांनी वाहने तर सोडा पण पायदळ चालणे सुद्धा कठीण झाले आहे. त्याचं प्रमाणे नवरगाव पासून जवळच असलेल्या पुलावरील मोठे खड्डे पडलेले आहे आणि पुलावरील सळाखी उघड्या पडलेल्या आहे. त्या मुळे  बरेच छोटे मोठे अपघात झाले आहे व आणखी अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.


हा रस्ता अनेक गावाला जाण्यासाठी मुख्य आहे नवरगाव, सागणापुर , म्हेसदोडका, रोहपट, वरून आंबेझरी बोरगांव, शिबला .झरी( जामणी) व अनेक गावाला जाण्यासाठी हा मुख्य मार्ग आहे. व मुख्य म्हणजे या परिसरातील जनतेला मारेगाव तालुक्याच्या ठिकाण ये- जा करण्यासाठी हाच मुख्य मार्ग आहे.

सध्या 10वी 12वी च्या परीक्षा सुरू आहे त्यामळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मारेगाव येथे शाळेत ये-जाण्यासाठी रस्त्यांनी चांगल्याच हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या आहेत आणि गाडी पंचर झाली तर विद्यार्थांचे  शैक्षणीक व शारिरीक नुकसान होण्याच्या मार्गावर आहे तरी या गंभीर विषया कडे सबंधित विभागाकडून लक्ष देण्यात यावे अशी परिसरातील जनतेची मागणी आहे.
रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास रस्त्यासाठी सस्ता असो की महाग उपाय शोधण्याच्या मार्गावर परिसरातील जनता आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!