शाळेत भोजन सुरु झाल्याने विध्यार्थ्यांच्या उपस्थितीत झाली वाढ
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
सविस्तर वृत्त असे की
महाराष्ट्र शासनाने शालेय पोषण योजने अंतर्गत मध्यांतर भोजन आहार योजना सुरु असती परंतु सदर योजना ही कोरोना विषानु मुळे मध्यांतरी भोजन व्यवस्था बंद होती.
सदर योजना ही दिनांक 15 मार्च 2022 पासून शासन आदेशान्वये सुरु करण्यात आली.परंतु शाळेला धान्य पुरवठा नसल्यामुळे ही योजना बंदच होती.आता दिनांक 31/03/2022 ला धान्य पुरवठा शाळेला झाल्यामुळे दिनांक 01/04/2022 पासून मध्यांतर भोजनाला सुरुवात झाली आहेत.यात भात व भाजी आणी आठवड्यातून एकदा पूरक आहार दिल्या जाते त्यात उपलब्दते नुसार विविध फळे ,राजगीरा लाडू,शेंगदाना चिक्की,खजूर/खारीक इत्यादी दिल्या जाते.या मुळे शाळेत विध्यार्थी संख्येत वाढ झाल्याचे चित्र दिसत आहेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे याभोजन आहारावर लक्ष केंद्रित करून प्रत्येक्ष भोजनाची तपासणी करून त्याचा स्वाद तपासून पाहतांनी दिसत आहेत.शाळेच्या मुख्याध्यापिका ह्य सुद्दा भोजन आहारात काही कमी राहू नयेत म्हणून काळजी घेताना दिसतात .येथील सर्व शिक्षकवृंद विध्यार्थ्यांना भोजन उत्तम प्रकारचे मिळण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
