तेलंगणातील औषधावार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वास.

किटकनाशके खरेदीसाठी राज्यातील शेतकऱ्यांची बेला, आदिलाबाद कडे धाव.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी :- जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन व कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.या पिकांवर मावा,तुडतुडे पांढरी,माशी,बोंड अळी या सारखे रोग येतात या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या कडे अनेक प्रकारच्या किडनाशक,किटकनाशके आहे परंतु ती पाहीजेत त्या प्रमाणात परिणाम करत नसल्याची आपल्या कडील शेतकऱ्यांचे म्हणणे असून त्या तुलनेत तेलंगणात राज्यात विकणारी औषधे परिणामकारक असून कपाशी पिकांची वाढ चांगली होते.

तसेच फांद्याची चांगली वाढ होण्यासाठी मदत होते व फुले व फळे चांगली येत असल्याचे अनुभव शेतकरी सांगत आहेत.त्यामुळे गेल्या तीन चार वर्षांपासून अनेक शेतकरी तेलंगणातील बेला आदिबाद या ठिकाणी खरेदी साठी जात असून वणी , झरी , मारेगांव, केळापूर इ तालुक्यातील शेतकऱ्यांची गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळतात.तेथिल कृषी सेवा केंद्रात लाखोची उलाढाल होत आहे.बरेच शेतकरी सुरुवाती पासूनच तेथिल औषधांची फवारणी करत आहेत .

एक्सोडस ,बायोस्पार्क,टेक्सा इ .औषधी गेल्या काही वर्षांत मोठया प्रमाणात वापर केला जात आहे.दोन वर्षात महाराष्ट्र राज्यात १ जून च्या आत बियाणाची विक्रीसाठी बंदी घालण्यात आली मात्र त्यामुळे १ ताखेच्या आत अनेक शेतकऱ्यांनी तेलंगणात बियाणाची खरेदी केली.परिणामी राज्यातील बियाणाचा खप कमी झाला.यावरून आपल्या राज्यात उपलब्ध बियाणे व किटक नाशके यांच्या दर्जा विषयी संशय व्यक्त केला जात असून आपल्या राज्यातील शासकीय धोरण याला कारणीभूत असल्याचे बोलेले जात आहे .

Leave a Comment

error: Content is protected !!