कमी पटसंख्या शाळा बंदच्या विरोधात धरणे आंदोलन.

संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, शिक्षक संघटना झरी यांचा सहभाग.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी: शून्य ते वीस पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे.याचा निषेध व्यक्त करीत झरी येथे मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड शाखा झरी तथा समस्त शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला अभिवादान करून धरणे आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. शासनाने गाव तिथे शाळा हे धोरण राबावीत असताना केवळ आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. ही बाब विचारात घेऊन तसेच शिक्षणावर जीडीपीच्या सहा टक्के खर्च करण्याऐवजी शून्य ते वीस बी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यासंदर्भात शासनाने जी कारवाई सुरू केलेली आहे त्याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात शाळा बंद करण्यात येऊ नये याबाबत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांनी या शाळा बंद झाल्यास तेथील गोर गरीब जनतेच्या शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होऊन ते कायमचे शिक्षण प्रवाहापासून दूर लोटले जातील. त्यामुळे या बाबीचा गांभिर्याने शासनाने विचार करावा, विद्यार्थीसंख्ये अभावी कोणतीही शाळा बंद करण्यात येऊ नये. असे मत विषद केले तर प्रमुख मार्गदर्शन अरविंद गनगुलवार सर व मंगेश खामणकर यांनी केले.

RTE अॅक्ट 2009 नुसार बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्काची तरतूद आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणात वस्ती तेथे शाळा हे धोरण शासनाने अवलंबले आहे. त्यानुसार वस्ती, वाडे, तांडे अशा दुर्गम भागात शाळा सुरु करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे निश्चितच शाळाबाह्य विद्यार्थी प्रमाण कमी झाले आहे.

कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांचे प्रमाण अतिशय दुर्गम तसेच वाडी, वस्ती, तांडे व आदिवासी बहुल क्षेत्रात अधिक आहे. त्यामुळे हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा या संदर्भात पुढील भूमिका बाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले. या आंदोलनाचे प्रस्थाविक काटकर सर यांनी केले. यावेळी संभाजी ब्रिगेड अध्यक्ष आशिष झाडे, प्रहार शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल केमेकार उपस्थितीत होते , तालुक्यातील विलास मडावी, राहुल धोटे, ओम कुळसंगे, रमेश आत्राम, माधव भिडकर आदी शिक्षक व पालक उपस्थित आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!