Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

अज्ञातानी फवारणी पाण्याच्या टाकीमध्ये टाकले तननाशक

मिरची पिकाचे मोठे नुकसान

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी नुकसान करण्याच्या हेतूने अज्ञात व्यक्तीने फवारणीच्या टाकीत तणनाशक मिसळून दीड एकर मिरची पिकाचे नुकसान झाल्याची तक्रार मार्की येथिल एका शेतकऱ्यांने मुकुटबन पोलीस ठाण्यात केली आहे.

सविस्तर वृत्त असे की..
मार्की (बु) येथील शेतकरी जीवन उलमाले यांनी दीड एकरात मिरची पिकाची लागवड केली आहे.पिक चांगले बहरले असून भरगच्च हिरव्या लाल मिरची पिक लदबदले पाहून समाजकंटकाला ते पाहवल नाही.

कामाच्या वेळेवर लाईट राहत नसल्याने शेतकरी आधीच फवारणी साठी टाकी भरून ठेवतात.त्याच टाकटीत फिकाचे नुकसान करण्याच्या हेतूने त्याचे पश्चात अज्ञात व्यक्तीने तणनाशक पाण्याच्या टाकीत टाकूण ठेवले.याच टाकीत शेतकरी जीवन उलमाले यांनी बहर व मिरचीची वाढ सृदृढ होणारे औषधी टाकून फवरणी केली.परंतु तिन -चार दिवसांनी पिक चांगले होण्या ऐवजी वाईट परिणाम दिसू लागले चांगले पिक पिवळे पडून वाळायला लागले.

इतर शेतकऱ्यांना पिक दाखवून चर्चा केली असता आपले आडून कोणी तरी वाईट हेतूने तणनाशक टाकले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.यामुळे दीड ऐकर असलेले जोमदार मिरची पीक उध्वस्त झाले.त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्याने पोलीस स्टेशन मध्ये या संदर्भात अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार नोंदविली आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!