Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

गोंड बुरांडा येथील घराला आग लागून साहित्य जळुन खाक.

शासनाने मदत करण्याची मागणी.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील गोंड बुरांडा येथील एका घरी कोणी नसतांना घराला आग लागून घरातील उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील गोंड बुरांडा येथे घडली. आधीच निराधार असलेल्या राजूचे घरही आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याने राजुवर मोठे संकट कोसळले असून शासनाने त्वरित मदत करावी अशी मागणी पीडिताने केलेली आहे.

गोंड बुरांडा येथील राजू महादेव आसूटकर असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. संकट यायला लागली की कशी एकामागून एक येत असतात असाच चांगला अनुभव राजुला आला. कोरोनाच्या महामारीत राजूने आई,वडील गमावले.राजू तो भूमिहीन आहे. कसाबसा मोलमजुरी करून तो जगत आहे.

अशातच दिवाळीच्या दिवशी दिनांक 26 ऑक्टोबर 2022 ला राजुने नेहमीप्रमाणे आपल्या घरी दिवे लावले. आणि तो बाजूलाच असलेल्या पानटपरीवर गेला. एवढ्याच वेळात लावलेल्या दिव्याची वात उंदीर अथवा इतर वस्तूने घरात नेली असावी आणि ही आग लागली असा संशय व्यक्त केल्या जात आहे.

या आगीमध्ये गृहउपयोगी साहित्य, अनाज, टीव्ही, टेबल, कागतपत्र,अंथरुणाचे साहित्य, सोबत मजुरीचे ठेवलेले 5 हजार रुपये हे सारे साहित्य जळून खाक झाले. मजुरीच्या भरोशावर आपली गुजरान करणाऱ्या एका गरीबाच्या घरातील सर्व साहित्य जळल्याने राजुवर आभाळ कोसळल्यागत संकट आले आहे.

आईवडिलांचे छत्र आधीच हरवलेल्या राजुला शासनाने मदत करावी असा सूर सगळीकडून उमटत असून राजुने यासंदर्भात मारेगाव तहसील येथे निवेदन देऊन आर्थिक मदतीची मागणी केलेली आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!