Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

मान्सूनपूर्व पावसाने उडवली दाणादाण

अनेकांची घरे पडली तर इलेक्ट्रिक पोल आणि झाडे सुद्धा उन्मळून पडली

सुरेश पाचभाई मारेगाव,

मान्सूनपूर्व पावसाने तालुक्यातील अनेक गावांना तडाखा दिला. अनेकांची दाणादाण उडाली.यात हिवरी,अर्जुनी आणि गोधनी या गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत अनेकांचे घरे उडाले शेतातील जनावरे बांधण्याचे गोठे उडाले तर रस्त्यावरील विद्युत खांब आणि झाडे सुद्धा उन्मळून पडल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

मागील काही दिवसापासून तालुक्यामध्ये गारपीट,वादळ वारा आणि अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातलेले आहे.दोन दिवसात सतत घर उडून नेणे विज पडून जनावरे दगावणे असे अनेक प्रसंग तालुक्यामध्ये घडत आहेत तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतानाही अवकाळी पाऊस मात्र थांबायचं  नाव घेत नाही.

आज दिनांक सहा जूनला दुपारच्या सुमारास आकाशामध्ये अचानक ढग दाटून आले आणि वादळ वाऱ्यासहित गारपीट आणि पावसाला सुरुवात झाली.वारा एवढा सोसाट्याने वाहत होता की या वाऱ्याने रस्त्यावरील झाडे सुद्धा ऊन मळून पडली अनेक गावातील अनेकांची घरे उडून गेली तर रस्त्यावरील विजेचे खांबसुद्धा उन्मळून पडले.

यामध्ये मजूर असलेले बंडू टेकाम,चंदू आत्रम लक्ष्मण मेश्राम भास्कर आत्राम,संजय आस्वले, संतोष कोडापे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या नागरिकांना या अकाली पडलेल्या पावसामुळे बेघर व्हावे लागले आहे.ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घरावरील छप्परच उडून गेल्याने आता राहायचे कुठे आणि संसार कसा चालवायचा असा यक्षप्रश्न या नागरिकांना पडलेला आहे.

राजेंद्र देरकर यांचा जनावरे बांधण्याचा गोठा उडून गेला आहे. तर निर्मला आत्राम यांच्या अंगावर घरावरील टीनावर असलेला दगड पडल्याने त्यांनाही इजा झालेली आहे.तसेच विद्युत खांब आणि झाडे सुद्धा उन्मळून पडलेली असून याकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!