Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान.

पंदरा दिवस होवून ट्रान्सफॉर्मर बदलण्यास टाळाळ
गहू ,चणा व मिरची सुकण्याच्या मार्गावर,शेतकऱ्यांचे तहशीलदारांना निवेदन.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी यावर्षी अतिवृष्टी खरिप हंगाम हातून गेला असतांना आता महावितरण निष्काळजीपणामुळे खरिप हंगामही हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सालेभट्टी गावा जवळील जामणी शिवारातील गजानन आत्राम यांच्या शेतातील ट्रान्सफार्मर जळाल्याने गेल्या १५ दिवसांपासून दहा ते बारा शेतकऱ्यांच्या शेतात जाणारा विद्यूत पुरवठा बंद झाला आहे.या सर्व शेतकऱ्यांनी उप विभागीय कार्य अभियंता झरी यांची भेट घेऊन नवीन ट्रान्सफर लावून देण्याची विनंती केली.

परंतु थकित बिल भरा तरच नवीन ट्रान्सफॉर्मर मिळेल असे अधिकारी यांचे कडून सांगण्यात आले.तडजोड करत शेतकऱ्यांनी बिलाचा भरणा केला असतांना सुद्धा दुसरा ट्रान्सफॉर्मर लावून पुरवठा सुरळीत केला नाही.त्यामुळे रब्वी हंगामातील गहु हरभरा वाळण्याच्या मार्गावर आहे.तसेच या शिवारातील शेतकऱ्यांनी मिरची पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.लाखो रुपये खर्चून पाण्याअभावी हे पिक हातून जाण्याची भिती निर्माण झाली आहे.

वारंवार चकरा मारून उपकार्यकारी अभियंत यांच्या कडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली असल्याने या शेतकऱ्यांकडून तहशीलदार गिरिश जोशी यांना निवेदन देण्यात आले आहे.तात्काळ विद्यूत पुरवठा सुरू करण्याची मागणी केली असून अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

त्यावेळी गिरिधर उइके माजी समाज कल्याण सभापती बाबाराव जांबुळकर,विठ्ठल देवाळकर,अनिल देवाळकर,विलास देवाळकर,जगण मिलमिले,अरुण कुडमेथे , अविनाश कुडमेथे,नागोराव उइके,गजानन आत्राम इ.शेतकरी उपस्थित होते .

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!