अन्यथा धरणात घेणार सामूहिक जलसमाधी.
हटवांजरी येथील शेतकऱ्याचे संबंधीत प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव मागील काही वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या तालुक्यातील हटवांजरी शेतजमीनीचा वाद न्यायप्रविष्ठ असून त्याचा निकाल येणाऱ्या 18 जानेवारीला लावण्यात यावा. जर निकाल 18 तारखेला लागला नाही तर प्रजासत्ताक दिनी सामूहिक जलसमाधी करू असा इशारा हटवांजरी येथील प्रकल्प पीडित शेतकऱ्यांनी अभियंता, मध्यम प्रकल्प यांना दिलेल्या निवेदनात दिलेला आहे.
हटवांजरी येथे नवीन निर्मित धरण प्रकल्पामध्ये हटवांजरी येथील 11 शेतकऱ्यांची जमीन सन 2009-10 मध्ये बुडीत क्षेत्रासाठी संपादित करण्यात आली होती. या संपादित केलेल्या जमीनीला 2008 च्या भावानुसार 1 लाख 42 हजार रुपये प्रति हेक्टरी याप्रमाणे 2015 मध्ये भाव ठरविण्यात आला होता.परंतु हा जाहीर केलेला भाव अत्यल्प आणि चालू बाजार भावा पेक्षा खूपच कमी होता.
त्यामुळे ही जाहीर केलेली रक्कम या शेतकऱ्यांनी उचललेली नव्हती. या 11 शेतकऱ्यांनी नवीन भुसंपादन कायद्यानुसार मोबदला रक्कम मिळावी यासाठी कलम 64 प्रमाणे ट्रिबिनल कोर्ट,आयुक्त कार्यालय नागपूर येथे प्रकरण न्यायप्रविष्ठ केले.दि.10 मे 2022 रोजी धरण ठिकाणी अभियंता तसेच उपविभागीय अभियंता यांचेशी चर्चा करून त्वरित निकाल लागावा यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिलेले होते.
परंतु या प्रलंबीत प्रकरणाचा निकाल लागण्यास विलंब होत असून या प्रकरणाच्या निकालाची तारीख 18 जानेवारी ही देण्यात आलेली आहे. या प्रकरणाचा दि.18 जानेवारीला निकाल लावण्यात यावा अन्यथा प्रजासत्ताक दिनी दिनांक 26 जानेवारी 2023 ला हटवांजरी येथील साचलेल्या धरणाच्या पाण्यात सामूहिक जलसमाधी करू असा इशारा या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प यवतमाळ यांना देण्यात आलेल्या निवेदनातून दिलेला आहे.
यावेळी विनोद वासाडे,दर्शना वासाडे, गणेश जुनगरी, नंदकिशोर लांडे, मोहन लांडे, ललिता उरकुडे, हेमराज कालेकर, बाबा भोयर, विलास वासाडे, वसंतराव वासाडे, पुरुषोत्तम वासाडे,
