ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी :- भारत हा कृषी प्रधान देश असून आधुनिक काळात सुधा त्याच पद्धतीने सण उत्सव साजरे केले जातात.ग्रामीण भागात गुढी पाडव्या पासून नवीन वर्षाची सुरुवात करतात.आज गावोगावी घराला आंब्याच्या पानाचे तोरणे व गुढी उभारून मराठी नववर्षाच स्वागत करण्यात आले.

साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवसाला फार महत्व आहे. शेतकऱ्यांना हा दिवस महत्वाचा असून या दिवसापासून शेतीचा नवीन हंगामची सुरूवात होते.भाड्याने किंवा भागीदारीने शेत करणारे या दिवसा पासून ग्राह्य धरतात.भाऊबंदकीची शेतीची हिस्से वाटणी या दिवसा पासून ग्राह्य धरण्यात येते.नवीन सालगडी या दिवसा पासून कामावर रुजू होतात.

आधुनिक काळात नवनवीन शेतीची अवजारे आली असली तरी बैल जोडी आणि पारंपारिक अवजारे यांना आजही महत्व आहे.याच अवजाराने जमीन कसली जाते.त्याच प्रमाणे शेतात राबणारा माणूस खूप महत्वाचा आहे.शेतात बारा महिने राबणाऱ्या सालगड्या च्या किंमती दिवसेंदिवस वाढ होत असून कमीत कमी १ लाख २० हजार काही गावात १ लाख ५० हजार रुपये एका वर्षांला मोजावे लागते.
चांगल्या व विश्वासु गड्यासाठी मालक इतरांपेक्षा जास्त किंमत द्यायला तयार असतो.ग्रामीण भागासह मोठ्या गावात चांगल्या गड्यासाठी चढाओढ सुरू असते.गुढीपाडव्यापासून नवीन गडी कामाला तोरण बांधून पुजा करून कामाला सुरुवात करतात.याच दिवशी साजोनी पुजन करून नविन हंगामाची सुरुवात होते, साजोनी साठी नवीन वखर,जुपणं’ लोखंडी फास नविन साहित्य शक्यतोवर लावली जाते.

जे शेतकरी स्वतः शेतात राबतात स्वतः साजोनी पूजन करतात.मोठे शेतकरी गड्याच्या हाताने साजोनी पुजा करतात.या निमिताने बैल धूवून साजसजोटो वखर जुंपून सकाळी शेतात नेतात. शेतात पूजन करून वखर शेतात व गावातील मंदिरात भोवती फिरविला जाते.त्यानंतर घरी आणून गृहलक्ष्मीच्या हस्ते बैलाचे पूजन केले जाते.

यावेळी स्थानदेवता आणि ग्रामदेवतांची ही पुजन करून साजोनी पुजन संपन्न होते.साजोनी पुजा केल्याशिवाय शेतातील मशागतीच्या कामाला सुरुवात केली जात नाही.काही गावाला ‘जुन्या सालात ‘ म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी तर काही ठिकाणी गुढी पाडव्याच्या दिवसी पाच धान्य एकत्र करून शिजवण्यात येते त्याला ग्रामीण भागात ‘घुगरी’ असे म्हणतात.

या दिवशी घुगरी खाण्याची पध्दत आहे .कुटुंबातील भाऊबंदकीची लोक तसेच बलुतेदार, मिञ मंडळी यांना सोबत घेवून गोडधोड जेवण करण्याची प्रथा आजही काही गावात रूढ आहे.
