ब्रेकिंग न्यूज
मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं
SP News Maregaon

‘साजोनी पुजन’ करून नविन शेती हंगामाचा शुभ मुहर्त.

87 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी :- भारत हा कृषी प्रधान देश असून आधुनिक काळात सुधा त्याच पद्धतीने सण उत्सव साजरे केले जातात.ग्रामीण भागात गुढी पाडव्या पासून नवीन वर्षाची सुरुवात करतात.आज गावोगावी घराला आंब्याच्या पानाचे तोरणे व गुढी उभारून मराठी नववर्षाच स्वागत करण्यात आले.

साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवसाला फार महत्व आहे. शेतकऱ्यांना हा दिवस महत्वाचा असून या दिवसापासून शेतीचा नवीन हंगामची सुरूवात होते.भाड्याने किंवा भागीदारीने शेत करणारे या दिवसा पासून ग्राह्य धरतात.भाऊबंदकीची शेतीची हिस्से वाटणी या दिवसा पासून ग्राह्य धरण्यात येते.नवीन सालगडी या दिवसा पासून कामावर रुजू होतात.

आधुनिक काळात नवनवीन शेतीची अवजारे आली असली तरी बैल जोडी आणि पारंपारिक अवजारे यांना आजही महत्व आहे.याच अवजाराने जमीन कसली जाते.त्याच प्रमाणे शेतात राबणारा माणूस खूप महत्वाचा आहे.शेतात बारा महिने राबणाऱ्या सालगड्या च्या किंमती दिवसेंदिवस वाढ होत असून कमीत कमी १ लाख २० हजार काही गावात १ लाख ५० हजार रुपये एका वर्षांला मोजावे लागते.

चांगल्या व विश्वासु गड्यासाठी मालक इतरांपेक्षा जास्त किंमत द्यायला तयार असतो.ग्रामीण भागासह मोठ्या गावात चांगल्या गड्यासाठी चढाओढ सुरू असते.गुढीपाडव्यापासून नवीन गडी कामाला तोरण बांधून पुजा करून कामाला सुरुवात करतात.याच दिवशी साजोनी पुजन करून नविन हंगामाची सुरुवात होते, साजोनी साठी नवीन वखर,जुपणं’ लोखंडी फास नविन साहित्य शक्यतोवर लावली जाते.

जे शेतकरी स्वतः शेतात राबतात स्वतः साजोनी पूजन करतात.मोठे शेतकरी गड्याच्या हाताने साजोनी पुजा करतात.या निमिताने बैल धूवून साजसजोटो वखर जुंपून सकाळी शेतात नेतात. शेतात पूजन करून वखर शेतात व गावातील मंदिरात भोवती फिरविला जाते.त्यानंतर घरी आणून गृहलक्ष्मीच्या हस्ते बैलाचे पूजन केले जाते.

यावेळी स्थानदेवता आणि ग्रामदेवतांची ही पुजन करून साजोनी पुजन संपन्न होते.साजोनी पुजा केल्याशिवाय शेतातील मशागतीच्या कामाला सुरुवात केली जात नाही.काही गावाला ‘जुन्या सालात ‘ म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी तर काही ठिकाणी गुढी पाडव्याच्या दिवसी पाच धान्य एकत्र करून शिजवण्यात येते त्याला ग्रामीण भागात ‘घुगरी’ असे म्हणतात.

या दिवशी घुगरी खाण्याची पध्दत आहे .कुटुंबातील भाऊबंदकीची लोक तसेच बलुतेदार, मिञ मंडळी यांना सोबत घेवून गोडधोड जेवण करण्याची प्रथा आजही काही गावात रूढ आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर