बुरांडा-खापरी रस्ता जलमय व चिखलमय.

रस्त्यात चिखलाचे,गिट्टीचे व खड्याचे साम्राज्य.

अर्धवट कामामुळे खापरी ग्रामस्थ त्रस्त.

विदर्भ एस. पि. न्युज नेटवर्क मारेगांव,

सविस्तर वृत्त असे की..
मारेगांव तालुक्यातील बुरांडा ते खापरी रस्त्याचे काम पंधरा वर्षानंतर करण्यात आले होते.पण अडीच किलोमीटर पैकी फक्त दोन किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात आले आहे.आणी उर्वरीत अर्धा किलोमीटर रस्त्यावर चिखल खड्डे व गिट्टीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

मारेगाव तालुक्यातील खापरी येथे जाण्याकरिता हा एकमेव मार्ग असुन अखेरची घटका मोजत आहे.पाऊसामुळे अर्धा किलो मीटर रस्त्याची अवस्था एवढी बिकट झालेली आहे.की वाहन दुरच राहीले पण पायदळ चालणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे.जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या खापरी ते बुरांडा रस्ता हा गेल्या वर्षी पंधरा वर्षांनंतर तयार करण्यात आला आहेत.

पण तो ही केवळ दोन किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात आले आहे.उखळलेल्या रस्त्याने अनेकांच्या दुचाकी पंचर होत आहे.गावात चार चाकी वाहन येणे तर दुरच राहिले एखाद्याचे आरोग्य बिघडल्यास त्याला येथुन तालुक्याच्या ठिकाणी येण्यास मोठी कसरत करावी लागत आहे.आणि बाहेरगावी शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना चिखल खड्यामुळे अथक त्रास सहन करावा लागला आहे.सन 2021- 2022 च्या मे महिन्यात अडीच की.मी.पैकी फक्त दोन किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात आले होते.

उर्वरित अर्धा की.मी.रस्ता पूर्णताहा उखडून चिखल खड्डे तयार झाले आहे.या रस्त्याने पायदळ चालने सुद्धा कठीण बाब आहे.अर्धवट काम झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या रस्त्याने ये -जा करणाऱ्याला वाटते की रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत असुन उर्वरीत अर्धा किलोमीटर रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा अशी गावातली नागरिकांनची मागणी आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!