ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

बिजप्रक्रिया करूनच रब्बी पिकांची पेरणी करा; मर रोग टाळा

126 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

– तालुका कृषी अधिकारी यांचे आवाहन

सुरेश पाचभाई, मारेगाव

मारेगाव : यंदा रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असले, तरी सततच्या पावसामुळे शेतीचे नियोजन विस्कळीत झाले आहे. खरीप हंगामात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आता रब्बी हंगामातून नुकसान भरून काढण्याच्या तयारीत आहेत. तथापि, या पावसाळी परिस्थितीमुळे रब्बी हंगाम नेहमीपेक्षा उशिरा सुरू झाला असून, उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर तालुका कृषी अधिकारी दिपाली खवले यांनी शेतकऱ्यांना हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करण्याचे आवाहन केले आहे.

कृषी विभागाने मारेगाव तालुक्यात यंदा एकूण ६,७८० हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांच्या पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात गहू, रब्बी ज्वारी आणि हरभरा या प्रमुख पिकांना प्राधान्य देण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे जमिनीत ओल जास्त असल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. हरभरा पीक ‘फ्युजारियम ऑक्सिसफोरम’ या बुरशीमुळे होणाऱ्या मर रोगाला विशेषतः बळी पडते. त्यामुळे पिकाची फेरपालट (Crop Rotation) करणेही फायदेशीर ठरते, असेही विभागाने नमूद केले आहे.

खवले यांनी सांगितले की, “जमिनीत विविध बुरशीजन्य किडींची बिजाणे सुप्तावस्थेत राहतात. तसेच रोगांचा प्रसार जमीन व बियाण्यांद्वारे होतो. त्यामुळे बीजप्रक्रिया हा त्यावर सर्वोत्तम उपाय आहे. बीजप्रक्रिया केल्याने उगवणीच्या व प्राथमिक वाढीच्या अवस्थेत पिकावर होणाऱ्या कीडरोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो.”

कृषी विभागाने शेतकऱ्यांना मर रोगाला प्रतिकारक्षम हरभरा वाणांची निवड करण्याचे आणि पेरणीपूर्वी योग्य ती बीजप्रक्रिया करूनच पेरणी करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून रब्बी हंगामात चांगले उत्पादन मिळू शकेल.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर