कोसारा (सोईट) पूल पाण्याखाली यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्याचा संपर्क तुटला.
विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगांव,
मारेगाव तालुक्यात काल पासुन सुरू असलेल्या मुसळधार पाऊसामुळे वर्धा नदीला पूर आला असून कोसारा (सोईट) गावाजवळील वर्धा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की.
तालुक्यात काल पासुन सततच्या पावसाने तालुक्याला अक्षरशः झोडपले असून अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेलेली आहे. तर कित्येक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र मारेगाव तालुक्यात दिसून येत आहेत.काही शेतकऱ्यांच्या शेतीला तलावाचे स्वरूप आल्यासारखे दिसत आहे.तर आज दिनांक 27 जुलै 2023 रोज गुरूवारला कोसारा पुलावरून पाणी असल्याने यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याचा संपर्क तुटलेला आहे.

प्रशासन अलर्ट असून नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले जात आहे.काल पासून सुरु असलेल्या सततधार पावसाने संम्पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.पावसामुळे घराबाहेर कोनालाही पडण्याची संधी मिळाली नाही.शेतकऱ्यांची शेती कामे खोळबली आहे.शेती कामे बंद असल्यामुळे शेतमजूरांना मजुरीवर पाणी सोडावे लागले.पावसामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी ओसांडून वाहत आहे.तालुक्यातील नदी,नाले, विहिरी तुडुंब भरलेले आहेत.

तालुक्यातून वाहणारी वर्धा नदी ही दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या कोसारा पूल पाण्याखाली आला असून या पुलावरून सुमारे 7 फूट एवढे पाणी वाहत आहेत.पावसामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.मारेगाव तालुक्यातील अनेक गावच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली.तालुक्यातील मार्डा येथील डॅमवरूनही पाणी ओसंडून वाहत आहे.

पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे.काल पासुन सतत सुरु असलेल्या पावसाने शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहेत. हातात आलेली पिके जाते की काय अशी भीती शेतकऱ्या मध्ये निर्माण झाली आहे.तालुक्यातील नदीसोबतच नालेही भरून वाहत असून नागरिकांनी दक्ष राहावे असे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे. तालुक्यातील महसुल प्रशासन व पोलिस प्रशासन पुर परस्थिती असलेल्या ठिकाणी भेट देत आहे.
