हजारो हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली.
पुर पीडित शेतकऱ्याची नुकसान भरपाईची प्रशासनाला मागणी.
विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव,
मारेगाव तालुक्यातील दापोरा ते चिंचमंडळ नाल्याला पुर आल्याने चिंचमंडळ येथील सुमारे 50% शेती पाण्याखाली
आली आहे.दापोरा हा नाला वर्धा नदीला मिळतो पण वर्धा नदीच्या पुराने रोद्र रूप धारन केल्याने दापोरा नाल्याचे पाणी वर्धा नदीमध्ये पास होऊ शकत नाही.त्या मूळे हे अडकलेले पाणी शेतकऱ्याचा शेतात जाऊन अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मागील वर्षीसुद्धा याच परिसरातील शेतकऱ्यांचे पुरामुळे मोठे नुकसान झाले होते.त्यावरील मलमपट्टी अजूनही पूर्ण झाली नाही तोच यावर्षी पुन्हा शेतकऱ्यांच्या दुखावर फुंकर घालण्याऐवजी पावसाने त्यांच्या दुःखात भर टाकल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.याचे त्वरीत पंचनामे करून प्रशासनाने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी पुर पीडित शेतकऱ्याची मागणी आहे.
