<<प्रशासना मध्ये उडाली एकच खळबळ>>
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव तालुक्यातील:– हटवांजरी येथील शेतकऱ्यांच्या धरणासाठी अधिग्रहीत केलेल्या जमिनीवर दिनांक 29एप्रिल 2022 रोज शुक्रवारला शेतकऱ्यांच्या जमिनीवर त्यांना कुठलीही पुर्व सूचना न देता जेशिपी मशीनच्या साह्याने खोद काम करण्यास सुरुवात केली. त्यामुळे रात्री 10वाजताच्या सुमारास शेतकऱ्यांनी खोदकाम केलेल्या शेतात जाऊन सामुहीक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
सन 2009/ 2010 मध्ये हटवांजरी-सराटी शिवारात धरण बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.या धरणासाठी हटवांजरी व सराटी या गावातील सुमारे 24 शेतकऱ्यांची शेतजमीन खरेदी करून अधिग्रहित केल्या गेली आहे. यात शेतकऱ्यांची 30 हेक्टर 82 आर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासाठी मोबदला म्हणून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 1 लाख 42 हजार 500 रुपये देण्याचे ठरले होते. परंतु शासनाकडून मिळणारी ही रक्कम फारच अल्प स्वरूपाचीअसल्याने हा मोबदला त्यावेळी एकाही शेतकऱ्याने स्वीकारला नाही. व त्यानंतर संबंधीत शेतकऱ्यांनी संमतीशिवाय जमिनीचे हस्तांतरण करण्यात येऊ नये अशा प्रकारची न्यायालयाला विनंती केली.
जिल्हाधिकारी यवतमाळ यांनाही निवेदन देऊन कैफियत मांडल्याची माहीती असुन जोपर्यंत नवीन दराने मोबदला मिळत नाही तोपर्यंत जमीनीचे हस्तांतरण करण्यात येऊ नये अशी विनंती केली आहे.

या अन्याया विरोधात ललिता उरकुडे,गणेश जुनगरी,बाबा भोयर, विलास वासाडे,नीलकंठ कालेकर, रामराव वासाडे, संभाशिव लांडे, विनोद वासाडे, वसंता वासाडे, सुमित्रा लांडे, पुरुषोत्तम वासाडे या शेतकऱ्यांनी भु. संपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना प्राधिकरण नागपूर यांचेकडे वाढीव मोबदल्यासाठी न्यायालयात केस दाखल केली आहे.
हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असतानाच जिल्हा सिंचन विभागाने दिनांक 29 एप्रिल रोजी जेसीपी च्या साहाय्याने खोदकाम सुरू केले. काम सुरू झाल्याचे कळताच हे सर्व शेतकरी 29 एप्रिल चे रात्री 10 वाजता सुमारास धरणाचे खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी शिवण सगाचा झाडाला गळसफास घेऊन सामुहीक आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतानाच गावात आरडाओरड झाल्याने गावातील उपस्थित लोकांच्या लक्षात हा प्रकार येताच पोलिसांना काही स्थानिक नागरिकांनी माहिती दिली माहिती मिळताच मारेगांव पोलीस घटनस्थळी दाखल झाल्या मुळे या शेतकऱ्यांना वाचविण्यात आले.आणि याची तात्काळ माहिती प्रशासनाला देण्यात आली.या घटनेने प्रशासनात एकच खळबळ निर्माण झाली आहे. यावेळी ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता.
