12 सप्टेंबर पर्यंत इ के वाय सी करण्याचे आवाहन.
सुरेश पाचभाई मारेगाव,
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत तालुक्यातील 2941 शेतकरी अजूनही इ के वाय सी तसेच बँक खाते आधार संलग्न नसल्याचे आढळून आले.या सर्व शेतकऱ्यांनी 12 सप्टेंबर पर्यंत आपले खाते इ के वाय सी तसेच आधार नोंदणी करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 14 व्या हप्त्याचे नुकतेच वितरण करण्यात आले. यासाठी पात्र लाभार्थ्यांचे ekyc व बँक खाते आधार संलग्न (NPCI seeded ) करणे व भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे या बाबी शासनाने बंधनकारक केलेल्या आहे.ज्या लाभार्थ्यांनी आजपर्यंत ekyc केले नसेल तसेच बँक खात्याला आधार संलग्न केले नसेल असे लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहे.
कृषी विभागातर्फे ekyc व बँक खाते आधार संलग्न करणेसाठी मोहीम राबवण्यात आली आहे.तरीही तालुक्यामध्ये आजपर्यंत 2077 लाभार्थीची ekyc व 864 लाभार्थी यांचे बँक खाते आधार संलग्न करणे प्रलंबित असल्याचे दिसून येते.प्रत्येक विभागामार्फत वेगवेगळे प्रयत्न करुनसुद्धा लाभार्थी ekyc व बँक खाते आधार संलग्न करण्याकरिता प्रतिसाद देत नाही अशा लाभार्थीना पोर्टल वरून वगळण्यात यावे अशा सूचना प्राप्त झालेल्या आहे.
तरी समोरील होणारे नुकसान टाळण्यासाठी 12 सप्टेंबरच्या आत सर्व लाभार्थ्यांनी ह्या बाबी पूर्ण करणे महत्वाचे आहे.जर एवढे प्रयत्न करूनही लाभार्थी ह्या बाबी पूर्ण करणार नसेल आणि प्रतिसाद देत नसेल तर अशा लाभार्थीची नावे रद्द करण्यात येईल असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मारेगाव यांनी केले आहे.
