मोजक्या शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ

चौकसीसाठी इतराच्या कार्यालयात चकरा

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी कोरडा दुष्काळ ओला दुष्काळ,चक्री वादळ , अतिवृष्टी,पूर या सारख्या नैसर्गिक आपत्तीत शेतीचे मोठ्या प्रमाण नुकसान होतात.शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिकं अशा परिस्थितीत जातात.मेहनत व लावलेला खर्च निघत नाही.अशा वेळी पिकविमा तारणहार ठरत असते नुकसान वेळी पुन्हा खंबीरपणे उभे राहता यावे या आशेवर शेतकरी पिका विमा काढतात.

परंतु तालुक्यात पिकाचे नुकसान होऊनही सरसकट पिक विमा मिळत नसल्याने ओरड केली जाते आहे.यावर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामात राज्य सरकार कडून हेक्टरी एक रुपयात पिकविमा योजना सुरू करण्यात आली आहे.त्यामुळे खरिप हंगामात सर्वच शेतकरी या योजनेत सहभागी झाले . तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले.

पैनगंगा नदीला आलेल्या पूरामुळे शेकडो एकर पिकाचे नुकसान झाले आहे.पण नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यात काही मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम जमा झाली अजूनही नव्वद टक्के शेतकरी या रकमेच्या प्रतीक्षेत आहे. क्लेम करून रक्कम का जमा होत नाही.याठी प्रधानमंत्री पिक विमा सुविधा कार्यालयात चौकशी करिता येत आहेत.

परंतु हे कार्यालय थोडावेळ साठीच उघडले जाते. कधी कधी शेतकऱ्यांना माघार जावं लागत आहे. आपापल्या पैसा मिळणार का नाही धास्ती असून पिक विमा कधी जमा होईल यासाठी जीव टांगणीला लागला आहे .

Leave a Comment

error: Content is protected !!