Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

निर्मळ जीवन जगल्यास संसारात बाधा येत नाही, हभप वृंदाताई पुणेकर

सुरेश पाचभाई मारेगाव,

माणूस जर निर्मळ जीवन जगला तर त्याच्या संसारात कसलीही बाधा येत नाही. तो सफल आणि यशस्वी जीवन जगतो असे उद्गार भागवत सप्ताह समारोपीय कीर्तनाच्या वेळी हभप वृंदाताई पूणेकर यांनी काढले.

चोपण येथे मागील काही वर्षांपासून भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.याही वर्षी दि.23 एप्रिलपासून ते 30 एप्रिल पर्यंत या भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. हभप वृंदाताई पुणेकर यांच्या सुमधुर वाणीतून या सप्ताहाला सुरुवात झाली होती.

श्रीक्रिष्णा यांच्या जन्म तसेच जीवनकार्यावर संगीतमय रचनेने प्रकाश टाकण्यात आला.भागवत सप्ताहाच्या काळामध्ये गावामध्ये भक्तीमय वातावरण निर्मिती होती.रस्ते स्वच्छ, दारोदारी रांगोळीही काढण्यात आल्या होत्या.

शेवटच्या दिवशी गावामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रंथदिंडी काढण्यात आली.आणि कीर्तनाने या भागवत सप्ताहाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमासाठी संपूर्ण ग्रामवासियांनी सहकार्य केले.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!