अल्पभुधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

तालुक्यातील नवरगाव येथील घटना

गजानन आसुटकर मारेगाव,

मारेगाव तालुक्यात आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासना कडून ठोस उपाय योजना केल्या जात नाही.तालुक्यात आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाही.नवरगाव येथील एका ३६ वर्षीय शेतकऱ्याने बैलाच्या गोठ्यात दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक २९ एप्रिल २०२४ रोज सोमवारला दुपारी २ वाजताच्या सुमारास  उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे की..
उमेश अशोक नक्षणे वय सुमारे ३६ वर्ष रा.नवरगाव ता.मारेगाव असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तिचे नाव असुन त्याचे कडे अंदाजे ५ एकर शेती असल्याची माहिती मिळाली आहे.तो शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा बातमी लीहिपर्यंत आत्महत्येचे नेमके कारण कळु शकले नाही.

उमेश यांनी आज बैलाच्या गोठ्यात दोराच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे कुटुंबियांच्या निदर्शनास येताच त्यांनी या घटनेची माहिती लगेच मारेगाव पोलिसांना दिली.माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पंचनामा करुन शव उत्तरीय तपासणी साठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.मृतक शेतकरी उमेश यांचे पश्चात आई,पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांचे मार्गर्शनाखाली जमादार किसन शुंकुरवार करीत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!