बुरांडा (ख) येथील 20 वर्षीय युवकांची गडफास घेऊन आत्महत्या

राज्य महामार्गावरील बुरांडा (ख)बस स्टॉप जवळील पुलाखालील घटना

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील बुरांडा (ख) येथील युवकाने राज्य महामार्गावरील बुरांडा बस स्टॉप जवळील पुलाखाली कठड्याला नायलॉन दोराच्या साह्याने गडफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोज रविवारला सकाळी 6 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

गोकुल राजु धुळे वय सुमारे 20 वर्ष रा.बुरांडा (ख ) ता .मारेगाव असे  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची युवकाचे नाव असुन तो काल रात्रीच्या सुमारास घरी कोणालाही न सांगता निघून गेला होता रात्री घरच्यांनी त्याचा शोधाशोध घेतला पण त्यांचा स्थाग पत्ता लागला नाही. सकाळच्या सुमारास काही शेतकरी शेताकडे जात असताना पुलावर नायलॉनचा दोर बांधून दिसल्याने सदर घटना उघडकीस आली.त्यांनी सदर घटनेची माहिती लगेच पोलीस पाटील बुरांडा (ख) यांना दिली.

त्यांनी लगेच मारेगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना करीता मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.बातमी लिहेपर्यंत त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.त्याच्या पश्चात बाबा,एक लहान भाऊ असा आप्तपरिवार आहे.या घटनेचा पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनात जामदार राजू टेकाम करीत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!