नुकसान झाले असल्यास पीकविमा कंपनीस पूर्वसूचना द्यावी

तालुका कृषी अधिकाऱ्याचे आवाहन

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यानी  खरीप हंगामातील पीक विमा भरला असेल तर आपल्या पिकाचे नुकसान जास्तीच्या पावसामुळे झालेले असल्यास अतिवृष्टी किंवा नदीकाठी पुरामुळे नुकसान यापैकी एक पर्याय निवडून पीक विमा कंपनीस पूर्व सूचना द्यावी असे आवाहन मारेगाव तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे.

पूर्व सूचना दिल्याशिवाय स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकांतर्गत विमा मिळत नाही.आपण आपल्या पिकाच्या नुकसानीची पूर्व सूचना टोल फ्री नंबर 14447 किंवा  सीएससी  सेंटर च्या माध्यमातून तक्रार नोंद करू शकता अथवा क्रॉप  इन्शुरन्स ॲप,या गोष्टींचा वापर करून देता येईल.पीक नुकसानीची पुर्वसचना ही पिकाचे नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आत (3 दिवसाच्या आत) देणे गरजेचे असते पुर्वसुचना उशिरा दिल्यास सदरची पुर्वसचना ग्राह्य धरली जात नाही.

अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषिसहायक,कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मारेगाव यांनी केले आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!