ब्रेकिंग न्यूज
पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख…
SP News Maregaon

पांदण रस्त्यांची दुरावस्था ; बळीराज्यांचे हाल !

558 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पांदण रस्त्याच्या योजना कागदावरच

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी 

झरी जामणी:परिसरातील शेतांना जोडणाऱ्या पांदन रस्त्यांची (शेतरस्त्यांची) स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे.अनेक ठिकाणी हे रस्ते पूर्णपणे उखडले असून, चिखल आणि खड्ड्यांमुळे शेतकऱ्यांना शेतीकामासाठी ये-जा करणे असह्य झाले आहे.

यामुळे बळीराजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.पावसाळ्यात तर या पांदन रस्त्यांवरून चालणेही मुश्कील होत आहे. चिखलामुळे ट्रॅक्टर, बैलगाडी किंवा इतर शेती अवजारे घेऊन जाणे तर सोडाच, पण पायी चालणेही धोकादायक बनले आहे. शेती अवजारे आणि खते शेतात पोहोचवणे कठीण झाले आहे.चिखलातून चालताना घसरून पडण्याचे, दुखापत होण्याचे प्रकार वाढले आहेत.

खराब रस्त्यांमुळे शेतात पोहोचण्यासाठी जास्त वेळ लागत असून मजूर वर्ग शेतात यायला तयार नाही.या पांदन रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अनेकदा शेतकऱ्यांनी स्थानिक प्रशासनाकडे निवेदने दिली आहेत. मात्र, त्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

“आम्ही रात्रंदिवस शेतात घाम गाळतो, पण आमच्यासाठी साधा रस्ताही चांगला नाही. प्रशासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे असा संताप,” एका शेतकऱ्याने व्यक्त केला.

ग्रामीण भागाच्या विकासासाठी चांगले रस्ते आवश्यक आहेत. पांदन रस्त्यांची ही दुरवस्था केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे, तर एकूणच कृषी विकासासाठी मारक ठरत आहे. यामुळे कृषी उत्पादनावर परिणाम होत असून,आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करण्यातही अडचणी येत आहेत. रस्त्यालगतच्या अनेक शेतकऱ्यांनी कसलीही मोजणी न करता रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे.त्यामुळे इतर शेतकरी या अरुंद व खराब रस्त्यामुळे वर्षानुवर्षे अडचणीत आला आहे.

वेळेवर शेतात पोहचता येत नाहीं. याचा नकारात्मक परीणाम होउन उत्पादनात घट होत असुन. आर्थिक नुकसान सहन करीत आहे. यावर प्रशासनाने स्वतः लक्ष घालून या पांदन रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. या रस्त्यांची डागडुजी करून ते वाहतुकीयोग्य बनवल्यास शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल आणि कृषी उत्पादनालाही चालना मिळेल. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा शेतकरी करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर