ब्रेकिंग न्यूज
Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात…
SP News Maregaon

धक्कादायक:एकाच कुटुंबातील तिघा अल्पवयीन मुलांना पळविले

134 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव: तालुक्यातील एका गावातील शेतमजुर दांपत्याच्या तिन्ही अल्पवयीन मुलांना एका व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात 9 वर्षीय मुलगी व दोन लहान मुलांचा समावेश आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 19 सप्टेंबर) संध्याकाळी तालुक्यातील एका शेतशिवारात घडली. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी आरोपीविरोधात बीएनएस कलम 137 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतो. दोन वर्षांपूर्वी तो अदिलाबाद जिल्ह्यातील निशानघाट येथे शेतीच्या कामानिमित्त गेला होता. तेथे त्याची एका महिलेबरोबर (वय 38) ओळख झाली. पुढे ही ओळख प्रेमात परिवर्तीत होऊन त्यांनी विवाह केला. विवाहानंतर पत्नी व तिची तीन मुलं यांना घेऊन तक्रारदार मारेगाव तालुक्यातील एका गावात शेतात सालगडी म्हणून राहू लागला.

दरम्यान, निशानघाट येथे काम करत असताना पत्नीची आरोपी देवीदास (वय 44, रा.मूळ गाव यवतमाळ जिल्हातील) याच्याशी ओळख झाली होती.शुक्रवारी संध्याकाळी आरोपी देवीदास तक्रारदाराच्या घरी आला. त्यावेळी पती-पत्नी शेतात मजुरीचे काम करत होते. “मी तुमच्या मुलांचे योग्य पालनपोषण करीन, त्यांना चांगले शिक्षण देईन” असे सांगून त्याने तिन्ही मुलांना फूस लावून नेले.

पती-पत्नी घरी परतल्यावर मुलं दिसली नाहीत. त्यांनी आरोपीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल बंद होता. दुसऱ्या दिवशी मुलांचा शोध घेण्यासाठी पत्नी निशानघाट येथे गेली. मात्र तेथेही आरोपी व मुलं कुठेच आढळून आले नाहीत. अखेर तक्रारदाराने मारेगाव पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी देवीदासविरोधात तिन्ही मुलांना फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा नोंदवला आहे. मारेगाव पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर