Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

कृषि विभागाच्या पुढाकाराने ‘सत्यमेव जयते फार्मर कप’चे शेतकरी प्रशिक्षण यशस्वी

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव : तालुक्यात गटशेतीची संकल्पना रूजवून कृषि क्षेत्रात शाश्वत समृद्धी आणण्याच्या उद्देशाने कृषि विभाग आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ करिता शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

पानी फाउंडेशनच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी शेतकऱ्यांना गटशेतीचे महत्त्व, गटबांधणीची आवश्यक प्रक्रिया आणि त्यातून साध्य होणारे सामूहिक फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शेतकरी प्रतिनिधी बाळवंतराव झोटिंग यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

तालुका कृषि अधिकारी कु.दिपाली खवले यांनी सत्यमेव जयते फार्मर कपमधील कृषि विभागाची भूमिका उलगडत गटशेतीच्या माध्यमातून होणाऱ्या प्रगतीबाबत शेतकऱ्यांना संबोधित केले. पानी फाउंडेशनचे मुख्य प्रशिक्षक शुभम ठक यांनी व्हिडिओ व कृषि पोवाड्याच्या माध्यमातून गटशेतीची संकल्पना प्रभावीपणे मांडली.

यावेळी प्रशिक्षक राजू कांबळे यांनी गटबांधणीची प्रक्रिया व तिचे फायदे विशद केले. प्रशिक्षक रिता ठवकर यांनी गटबांधणी प्रक्रियेत महिलांच्या सहभागाचे महत्त्व स्पष्ट केले. तर दुर्गेश गुरनुळे यांनी गटशेतीतून पानी फाउंडेशनच्या सहकार्याने समृद्धीकडे वाटचाल कशी शक्य होते हे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ कृषि अधिकारी किशोर डोंगरकार यांनी केले. महाविस्तार ए-आय अॅपचा वापर व त्याचे फायदे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकातून समजावून सांगण्यात आले.

तालुक्यातील सर्व सहायक कृषि अधिकारी, उपकृषी अधिकारी, कृषि ताई व कृषि सखी यांच्या सहकार्याने आयोजित या प्रशिक्षणास दीडशेहून अधिक शेतकऱ्यांची उपस्थिती लाभून कार्यक्रम यशस्वी झाला.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!