Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

अतिदयनीय रस्त्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

पाच गावांचा सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार जाहीर

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव :तालुक्यातील करणवाडी, नवरगाव, हिवरी, सगणापूर आणि म्हैसदोडका या पंचक्रोशीतील गावांनी अतिदयनीय रस्त्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांवर बहिष्कार जाहीर केला आहे. अर्जुनी, गोधनी, रायपूर आणि रोहपट या ग्रामस्थांनीही या निर्णयाला पाठिंबा दिल्याचे कळते.

ग्रामस्थांच्या वतीने मारेगावच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था, जागोजागी पडलेले मोठमोठे खड्डे, धुळीमुळे वाढणारे श्वसनाचे आजार आणि वारंवार घडणारे अपघात तसेच रस्त्याचे रुंदीकरण-नूतनीकरण वर्षानुवर्षे न झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

ग्रामस्थांनी यापूर्वी प्रशासनाला अनेक निवेदनपत्रे दिली असून शांततापूर्ण उपोषणे व आंदोलने केली होती. मात्र तरीही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

“आरोग्य, शिक्षण आणि वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आम्हाला मतदान बहिष्कार हा शेवटचा मार्ग स्वीकारावा लागत आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या निवेदनाची प्रत राज्यपाल, मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, खासदार, आमदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनाही पाठवण्यात आली आहे.

गावनिहाय नागरिकांच्या स्वाक्षरींची यादीही प्रशासनाला सोपवण्यात आली आहे.सदर प्रकरणाची प्रशासन कोणत्या स्तरावर दखल घेते याकडे आता तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!