120 शेतकरी गटांची उल्लेखनीय कामगिरी:शेतकरी गटाचा सन्मान सोहळा; उत्पादनही वाढले, ठरले गौरवाचे मानकरी‎

| अकोला १२० शेतकरी गटांनी शेतीत उल्लेखनीय कामगिरी केल्याने ते गौरवाचे मानकरी झाले आहेत. सन २०२२ पासून पाणी फाउंडेशन ज्ञान आणि गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी काम करत आहे. गेल्या ३ वर्षांत ही चळवळ ४६ तालुक्यांपर्यंत पोहोचली आहे. ‘गटशेती प्रीमियर लीग (जीपीएलन)’ आयोजित करण्यात आली होती. यात ज्यात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन खर्च कमी करणे आणि नफा वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले. यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गटांचा गौरव करण्यासाठी सन्मान सोहळा पार पडला. शेतकरी पुढील वर्षीच्या ‘संपूर्ण महाराष्ट्र फार्मर कप’ साठी नव्या जोमानं सज्ज होत आहेत. ‘गटशेती प्रीमियर लीग’च्या अनुषंगाने बार्शीटाकळी तालुक्यात ४२ शेतकरी गटांना प्रमाणपत्र देण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मोर्णा शेतकरी गटाचे निमंत्रक रामेश्वर उंडाळ होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक उज्वल बोलवार होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच संदीप चौधरी, कृषी मंडळ अधिकारी अविनाश मेश्राम, युवा पुरस्कार प्राप्त ज्ञानेश्वर शेषराव, तुषार वानखडे, उमेद अभियानाचे नीलेश गायकवाड, अश्विनी नवघरे, रूपाली गावंडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संघपाल अरुण वाहूरवाघ यांनी केले. बार्शीटाकळी तालुक्यातील पाच शेतकरी गटातील निमंत्रकांनी पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेचा प्रवासाची मांडणी केली. यात कान्हेरी सरप येथील मैत्री संघ महिला शेतकरी गटाच्या निमंत्रक रेश्मा इंगळे, राजंदा येथील भारती महिला शेतकरी गटाच्या ज्योती महल्ले, चेलका येथील मोर्णा पुरुष शेतकरी गटाचे विजय उंडाळ, बळीराजा महिला गटाच्या दीपाली उंडाळ, घोटा येथील माऊली पुरुष गटाचे पवन तवाडे यांनी फार्मर कप स्पर्धेचा प्रवास सांगितला. एकरी १२ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन : भरारी महिला शेतकरी गटाने सुद्धा गट प्रीमियर लींक स्पर्धेमध्ये कामगिरी करून उत्पादन वाढवले. एकरी १२ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन त्यांनी झाले. त्यांनी एसओपीची कटाक्षाने अंमलबजावणी केल्याने त्यांनी सांगितले. शेतकरी गटांचा गौरव करण्यात आला. ४२ गटांना सन्मानपत्र विभागीय समन्वयक उज्वल बोलवार यांनी शेतकरी गटाचे निमंत्रक सदस्यांना मार्गदर्शन केले. पुढील वर्षी संपूर्ण तालुक्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांची गट करून आपले उत्पादन वाढवावे असे आवाहन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बार्शीटाकळी तालुक्यातील ४२ शेतकरी गटांना सन्मानपत्र देण्यात आले.

Leave a Comment

error: Content is protected !!