ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

पिंपळवाडी शिवारात अपघात, बार्शी – येरमाळा मार्गावर ग्रामस्थांचा रास्ता रोको:दुचाकीच्या धडकेत महिला जागीच ठार; गेल्या 15 दिवसातील तिसरा बळी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बार्शी-येरमाळा राज्यमार्गावरील तालुक्यातील पिंपळवाडी शिवारात अपघातांची मालिका सुरूच आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजता रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात आविदा शिवराज चौधरी (वय ५५, रा. पिंपळवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. मागील १५ दिवसांतील हा तिसरा अपघात आहे. अपघातग्रस्त मार्गावर तातडीने गतिरोधक बसविण्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी बार्शी येरमाळा राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. अखेर लेखी आश्वासनानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान मंगळवारी सकाळी संतप्त ग्रामस्थांनी पिंपळवाडी बसस्थानकाजवळ दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. “अजून किती बळी जाणार? प्रशासनाला जाग कधी येणार?” अशा घोषणा देत वाहतूक रोखून धरण्यात आली. पिंपळवाडी गावातून जाणारा हा राज्यमार्ग वर्दळीचा आहे. गावाची वस्ती, शाळा, मंदिर व ग्रामपंचायत कार्यालय रस्त्यालगतच असल्याने नागरिकांना वारंवार रस्ता ओलांडावा लागतो. मात्र एकही गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने जातात. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांत या ठिकाणी ८ जणांचा मृत्यू झाला असून २० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. गतिरोधक बसवावेत, वेगमर्यादेचे फलक लावावेत व वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि उपविभागीय अधिकाऱ्यांकडे वारंवार केली. मात्र केवळ आश्वासनांपलीकडे कार्यवाही झाली नसल्याचा प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले व मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या मार्गावर प्रत्येक अपघातानंतर संबंधित विभागाचे अधिकारी येतात, केवळ औपचारिकता म्हणून पाहणी करतात, ग्रामस्थांच्या रोषाला शांत करण्यासाठी तात्पुरते आश्वासन देतात आणि निघून जातात. यावेळी आंदोलनामुळे प्रशासनाने ‘लेखी’ पत्र देण्याची तसदी घेतली. ग्रामस्थांचा आरोप आहे. गतिरोधकासाठी वर्षभरापासून पाठपुरावा करत आहोत. प्रत्येक अपघातानंतर अधिकारी येतात, पाहणी करतात आणि निघून जातात. तातडीने गतिरोधक न बसवल्यास तहसील कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला. भीषण धडकेनंतर दुचाकीस्वार फरार; दोन वर्षांत ८ जणांचा मृत्यू सोमवारी सायंकाळी आविदा चौधरी रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून फरार झाला. पांगरी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बार्शी ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर