ब्रेकिंग न्यूज
10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात… Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं
SP News Maregaon

‘चला कवितेच्या बनात’चा गौरव:उदगीरचे अनंत कदम यांना रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार जाहीर

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


यंदाचा रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार उदगीरचे अनंत कदम यांना जाहीर केल्याची माहिती, साहित्यिक सुरेंद्र पाटील यांनी दिली. पाटील यांनी आपल्या वडिलांच्या नावाने हा पुरस्कार सुरू केलाय. साहित्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे साहित्यिक, संस्था किंवा व्यक्तीसाठी पाच हजार रुपये, ग्रंथभेट, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारासाठी कसलीही प्रवेशिका मागवली जात नाही. विशेष म्हणजे पुरस्कारप्राप्त व्यक्तीच्या घरी जाऊन हा पुरस्कार सन्मानपूर्वक दिला जातो. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. उदगीरचे अनंत कदम हे एक उपक्रमशील शिक्षक असून त्यांनी वाचन चळवळीची गरज लक्षात घेऊन जून २०११ पासून ‘वाचक संवाद’ हा उपक्रम सुरू केला तो आजही समविचारी मित्रांना घेऊन अखंडपणे चालू आहे. आत्तापर्यंत ३५१ वक्त्यांनी त्यांच्या या उपक्रमात हजेरी लावलेली आहे. आतापर्यंत ३५१ पुस्तकांवर तितक्याच संवादकांनी ‘वाचक संवाद’मध्ये संवाद साधलेला आहे. ‘चला कवितेच्या बनात’ हा उपक्रमही ते राबवतात. या यशस्वी उपक्रमशीलतेमुळे त्यांची निवड केल्याचे सुरेंद्र पाटील यांनी सांगितले. येत्या जानेवारीमधे त्यांच्या घरी जाऊन अनंत कदम यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराने अनंत कदम यांच्या कार्याची दखल घेतल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. पहिला रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार कथाकार सचिन वसंत पाटील यांच्या मायबोली रंग कथांचे या पुस्तकास मिळाला होता. सचिन पाटील यांचा त्यांच्या घरी जाऊन त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. संबंधित वृत्त जिद्दी लेखकाचा सन्मान:सचिन पाटील यांच्या मायबोली रंग कथांचे पुस्तकाला पहिला रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार जाहीर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर