स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला बसलेला जबर धक्का, त्यानंतर पक्षांतर्गत निर्माण झालेली अस्वस्थता आणि त्यावर आलेल्या विविध प्रतिक्रिया यामुळे राज्याच्या राजकारणात नवे वळण पाहायला मिळत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि नेते आशिष देशमुख यांच्या भूमिकांमुळे हा विषय अधिकच चर्चेत आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 11 नगरपालिकांपैकी केवळ एक नगरपरिषद आणि एक नगरपंचायत भाजपला जिंकता आल्याने पक्षाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. या पराभवावरून मुनगंटीवारांनी थेट पक्ष संघटनेवर नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर भाजपमधील सुप्त मतभेद उघडपणे समोर आले. चंद्रपूरमधील निकाल जाहीर झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी या पराभवाची जबाबदारी पक्षाच्या कार्यपद्धतीवर टाकली. त्यांच्या या वक्तव्यामुळे पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुनगंटीवार यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची चर्चा रंगली. मुनगंटीवारांनी यानंतर राज्यभर दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची घोषणा केली होती. या दौऱ्याच्या घोषणेला अनेकांनी अंतर्गत नाराजीचा सूर असल्याचे मानले. भाजपमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकांमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीने, पक्षाच्या एकजुटीबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले. मात्र, काही दिवसांतच या राज्यव्यापी दौऱ्यावर मुनगंटीवारांनी स्वतःच पडदा टाकला. नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, राज्यभर दौऱ्याचा विषय आता संपला आहे. तो विषय आता बंद झाला आहे. भेटीगाठी होत राहतील, चर्चा होतील, असे सांगत त्यांनी या मुद्द्यावर अधिक बोलणे टाळले. सध्या आपण काही नेत्यांना भेटत असल्याचे त्यांनी सांगितले. या वक्तव्यामुळे मुनगंटीवारांनी आपली भूमिका काहीशी मवाळ केल्याचे संकेत मिळाले. त्यांच्या या बदललेल्या भूमिकेमुळे भाजपमध्ये सुरू असलेली चर्चा काही प्रमाणात शांत होत असल्याचे चित्र आहे. मुनगंटीवारांचा दौरा रद्द होण्यामागे पक्ष नेतृत्वाशी होणारा संवाद दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील पराभवावर भाजपने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले होते. त्यांनी मुनगंटीवार यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. त्यानुसार आज सुधीर मुनगंटीवार यांची मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत चंद्रपूरच्या निकालासह आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुनगंटीवारांचा दौरा रद्द होण्यामागे पक्ष नेतृत्वाशी होणारा थेट संवाद हेच कारण असल्याची चर्चा आहे. सुधीरभाऊ नाथाभाऊंच्या मार्गावर तर चालले नाहीत ना? – आशिष देशमुख या संपूर्ण वादावर भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी प्रतिक्रिया देत मुनगंटीवारांच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केले. त्यांनी मुनगंटीवारांची तुलना थेट माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याशी करत, सुधीरभाऊ नाथाभाऊंच्या मार्गावर तर चालले नाहीत ना? असा सवाल उपस्थित केला. देशमुख म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांची अशी कोणतीही इच्छा नाही की पक्षात मतभेद निर्माण व्हावेत. मुनगंटीवारांनी फडणवीसांवर श्रद्धा आणि संयम ठेवावा, असा सल्लाही त्यांनी दिला. मुनगंटीवार हे वरिष्ठ नेते असून त्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होईल, त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींची मेहेरनजर राहील, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले. सख्खे भाऊ एकत्र यावेत, ही आमची सदिच्छा दरम्यान, राजकीय चर्चेत असलेल्या ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवरही सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. दोन सख्खे भाऊ एकत्र यावेत, ही आमची सदिच्छा आहे. मुंबईमध्ये त्यांचा जीव आहे, त्यामुळे मुंबईसाठी ते सर्व प्रयत्न करतील, असे मुनगंटीवार म्हणाले. या वक्तव्यामुळे भाजपचा ठाकरे बंधूंच्या युतीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही स्पष्ट झाला. मुंबईतील राजकारणात या घडामोडींचा मोठा प्रभाव पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुनगंटीवारांची माघार आणि बावनकुळेंची समन्वयाची भूमिका महायुतीबाबत बोलताना मुनगंटीवारांनी स्पष्ट केले की, भारतीय जनता पार्टी जिथे शक्य आहे, तिथे महायुती एकत्र लढत आहे. मात्र, प्रत्येक शहराची राजकीय परिस्थिती, संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊनच युती किंवा आघाड्यांचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे कुठे महायुती, कुठे महाविकास आघाडी किंवा स्थानिक समीकरणे पाहून निर्णय होतात, असे त्यांनी नमूद केले. एकंदरीत, चंद्रपूरच्या पराभवातून निर्माण झालेला भाजपमधील वाद, त्यावर मुनगंटीवारांनी घेतलेली माघार, बावनकुळेंची समन्वयाची भूमिका आणि देशमुखांनी उपस्थित केलेले प्रश्न, या सर्व घडामोडींमुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणाची दिशा स्पष्ट होत असल्याचे चित्र सध्या राज्यात दिसत आहे.
पराभवाचे खापर, शब्दांची चकमक आणि अखेर पडदा:मुनगंटीवारांनी दौरा गुंडाळला; बावनकुळे आणि आशिष देशमुखांची वक्तव्ये चर्चेत
-
By सुरेश पाचभाई
- December 23, 2025
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
नांदेडनंतर संभाजीनगरचे ठाकरेंचे पदाधिकारीही शिंदेसेनेच्या वाटेवर:DCM म्हणाले,...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 16, 2026
मोठी बातमी:राज्य सरकारने थकीत शेतकरी कर्जदारांचा डेटा...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 16, 2026
टिपू सुलतानांचे वंशज भाजपमध्ये गेल्यास त्यांनाही पदे...
5views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 16, 2026
पुणे पोलिसांची राजस्थानमध्ये मोठी कारवाई, 4.27 कोटींचा...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 16, 2026
सोलापुरात रूपभवानी मंदिर परिसरात अपघात:पहाटे चार वाजता...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 16, 2026
काँग्रेस भवन आंदोलनाप्रकरणी भाजप, काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 16, 2026
टिपू सुलतान अत्याचारी अन् बलात्कारी:उद्धव ठाकरे आमदारकीसाठी...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 16, 2026
