शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफीची घोषणा 30 जूनपर्यंत अंमलात येणार आहे. सध्या विधानपरिषद निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यासाठीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे या काळात शेतकरी कर्जमाफी होणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, या सर्व चर्चांवर पडदा टाकत कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी मोठी आणि दिलासादायक माहिती दिली आहे. काय आहे नेमका गोंधळ? केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी बिगुल वाजवले आहे. 25 जूनपर्यंत ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. नेमकी याच काळात कर्जमाफीची अंमलबजावणी होणार असल्याने, आचारसंहितेच्या नियमांमुळे ही प्रक्रिया रखडणार का? अशी शंका उपस्थित केली जात होती. कृषीमंत्र्यांची ग्वाही: “अडचण येणार नाही!” या निर्माण झालेल्या संभ्रमावर बोलताना कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी स्पष्ट केले की, निवडणूक असली तरी कर्जमाफीच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य आणि सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भरणे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकरी कर्जमाफीबाबत योग्य निर्णय घेतील. थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळेल. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल. येत्या 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल.” सर्वसामान्यांची निवडणूक नसल्याने दिलासा? विशेष म्हणजे, ही विधानपरिषद निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून होत आहे. यात थेट जनता मतदान करत नसून, जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी मतदान करतात. त्यामुळे या आचारसंहितेचा थेट फटका शासकीय योजनांना बसू नये, अशी रणनीती सरकार आखत असल्याचे दिसते. आचारसंहितेचे सावट असले तरी कृषीमंत्र्यांच्या वक्तव्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता दिलेल्या शब्दाप्रमाणे सरकार ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या पदरात हे दान कसे टाकते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. योजनेचे मुख्य स्वरूप खालीलप्रमाणे असेल:
शेतकरी कर्जमाफी 30 जूनपूर्वी होणार:कृषीमंत्री भरणे म्हणाले- आचारसंहितेचा अडथळा नाही, CM फडणवीस सकारात्मक निर्णय घेतील
auto_awesomeथोडक्यात महत्त्वाचे
शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफीची घोषणा 30 जूनपर्यंत अंमलात येणार आहे. सध्या विधानपरिषद निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यासाठीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे...