राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असली, तरी कल्याण-डोंबिवलीत मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केडीएमसी निवडणूक स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिल्याने महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर बोलताना रवींद्र चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांना आक्रमक पवित्रा घेण्याचे निर्देश दिले. ज्याप्रमाणे केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे, तसेच सरकार आपल्याला महापालिकेतही आणायचे आहे. त्यामुळे यावेळेस जो उमेदवार ‘कमळ’ चिन्हावर उभा राहील, त्यालाच मतदान करा, असे आवाहन चव्हाण यांनी केले. विशेष म्हणजे, त्यांनी हे विधान विचारपूर्वक केल्याचे सांगत आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचेही स्पष्ट केले. 122 जागांवर भाजपचा डोळा? कल्याण-डोंबिवलीत भाजपच्या 10-10 हजार कार्यकर्त्यांमधून केवळ 122 निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. या विधानाचा अर्थ भाजप सर्व जागांवर आपले उमेदवार उभे करणार, असाच काढला जात आहे. एकनाथ शिंदे यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड वगळता सर्वत्र महायुती एकत्र लढणार असल्याचे जाहीर केले होते, मात्र चव्हाणांच्या या भूमिकेमुळे ‘केडीएमसी’मध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ग्रामीण भागात चांगली कामगिरी केली असली, तरी त्यांच्या बालेकिल्ल्याला लागून असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. बदलापूर आणि अंबरनाथमधील शिवसेनेचा हा पराभव खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. याच यशाच्या जोरावर आता भाजपने कल्याण-डोंबिवलीतही शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला सारून स्वबळाची तयारी सुरू केली आहे. खासदार श्रीकांत शिंदेंची अडचण वाढणार? कल्याण-डोंबिवली हा भाग खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असल्याने या ठिकाणच्या महापालिका निवडणुकीत भाजपची स्वबळाची भूमिका त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. केंद्रात आणि राज्यात ‘डबल इंजिन’ सरकार असताना स्थानिक स्वराज्य संस्थेतही 100 टक्के भाजपचाच विचार हवा, असा आग्रह रवींद्र चव्हाण धरत असल्याने महायुतीमधील अंतर्गत संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे.
केडीएमसीमध्ये महायुतीला तडा?:एकनाथ शिंदे म्हणतात ‘एकत्र’, तर रवींद्र चव्हाणांचा ‘स्वबळा’चा नारा; राजकीय वर्तुळात खळबळ
-
By सुरेश पाचभाई
- December 22, 2025
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
विमानाच्या शेपटीतील ब्लॅक बॉक्स जळाला कसा?:आमदार अमोल...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 17, 2026
पार्थ पवारांना क्लीन चीटच्या बातम्या राजकीय हेतूने...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 17, 2026
उद्धव ठाकरेंनी किशोरी पेडणेकरांचा केसाने गळा कापला:पालिकेच्या...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 17, 2026
अजित पवारांचा मृत्यू अपघाती वाटत नाही:काँग्रेस नेते...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 17, 2026
अल्पसंख्याक प्रमाणपत्र वाटप प्रकरणात योग्य कारवाई होईल:मुख्यमंत्री...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 17, 2026
अजितदादांच्या अपघाताविषयी कुठेच काही होत नाही:ब्लॅकबॉक्स बॉम्बस्फोटापासून...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 17, 2026
नांदेडनंतर संभाजीनगरचे ठाकरेंचे पदाधिकारीही शिंदेसेनेच्या वाटेवर:DCM म्हणाले,...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 16, 2026
