Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

काँग्रेसचा महापौर पदासाठी भिवंडीत मोठा गेम:भिवंडी सेक्युलर फ्रंटची केली घोषणा; आघाडीत सप, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा समावेश

काँग्रेसने भिवंडी – निजामपूर महापालिकेचे महापौरपद मिळवण्यासाठी भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना केली आहे. या आघाडीत काँग्रेससह समाजवादी पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा समावेश आहे. यामुळे भिवंडीत काँग्रेसचा महापौर बसेल हे जवळपास स्पष्ट झाले आहे. राज्यात मुंबईसह 29 महापालिकांची नुकतीच निवडणूक झाली. त्यानंतर आता या ठिकाणी महापौर पदाच्या निवडीसंदर्भात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. या प्रकरणी अनेक ठिकाणी युत्या व आघाड्यांचे राजकारण सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भिवंडी महापालिकेच्या महापौरपदासाठी सप – काँग्रेस – राष्ट्रवादी (शरद पवार) या 3 पक्षांच्या भिवंडी सेक्युलर फ्रंटची घोषणा केली आहे. भिवंडी पूर्वचे सप आमदार रईस शेख हे या फ्रंटचे संयोजक आहेत. तर काँग्रेसचे माजी आमदार रशीद मोमीन हे अध्यक्ष, तर शरद पवार गटाचे सोहेल गुड्डू हे सहसंजोयक आहेत. सेक्युलर फ्रंटकडे स्पष्ट बहुमत 90 सदस्यीय भिवंडी महापालिकेत महापौर पदासाठी 46 हा जादुई आकडा आहे. त्यामुळे सेक्युलर फ्रंटकडे सध्या काँग्रेसचे 30, शरद पवार गटाचे 12 व सपचे 6 असे एकूण 48 नगरसेवक आहेत. त्यामुळे याच आघाडीचा महापौर होईल हे स्पष्ट आहे. या आघाडीची माहिती देताना आमदार रईस शेख म्हणाले की, भिवंडीच्या जनतेने धर्मनिरपेक्ष पक्षांना कौल दिला आहे. त्याचा आदर करत आम्ही भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना केली आहे. एकता, बंधूभाव व विकास हा आमच्या फ्रंटचा मुलाधार असले. भिवंडीत आता एकही नगरसेवक विकला जाणार नाही याची खात्री आम्ही देऊ. भिवंडी सेक्युलर फ्रंटला सपचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव, प्रदेशाध्यक्ष अबू आझमी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व शरद पवार गटाचे स्थानिक खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांचा पाठिंबा आहे, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे समाजवादी पार्टीने स्थानिक पातळीवर सर्व निर्णय घेण्याचे अधिकार रईस शेख यांना दिले आहेत. तसे पत्र अबू आझमी यांनी प्रसिद्ध केले आहे. सेक्युलर फ्रंटचाच महापौर होईल – आमदार रईस शेख भिवंडी – निजामपूर महापालिकेत धर्मनिरपेक्ष आघाडीचा महापौर बसवणे हे आमच्या भिवंडी सेक्युलर फ्रंटचे उद्दीष्ट आहे. धर्मनिरपेक्षता व सर्वसमावेशक विकास यासाठी आमची आघाडी कटिबद्ध आहे. भिवंडीकरांनी आम्हाला ऐतिहासिक कल दिला आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आमचा फ्रंट कायम प्रयत्नशील असेल, असेही रईस शेख यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!