राजकारणात गेल्या दोन दिवसांमध्ये ज्या घडामोडी पाहिल्या यामुळे असे वाटते की माणसांपेक्षा खुर्चीला जास्त महत्त्व आहे. राजकारणामध्ये खुर्ची जिंकलेली आहे, सार्वजनिक जीवनातही खुर्चीच जिंकली आणि माणूस हरल्याचे चित्र दिसून येत आहे. सर्व सामान्य माणसांना या गोष्टी भावत नाहीत, शासकीय दुखवटा संपण्यापूर्वी हे सर्व निर्णय व्हायला नको होत असे मला वाटते, असे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. संजय शिरसाट म्हणाले की, शरद पवारांनी जे सूचक वक्तव्य केले आहे त्याकडे जर पाहिले तर राजकारणातील घडामोडीमध्ये शरद पवारांना विचारले गेले नसावे. पक्षातील नेत्यांनी आणि राजकीय सल्लागारांनी घेतलेला हा निर्णय शरद पवारांना याबद्दल कितपत माहिती आहे हे सांगणे शक्य नाही. देवेंद्र फडणवीस यांनी जी उपमुख्यमंत्रीपदाबाबत जी भूमिका घेतलेली आहे तीच भूमिका आमची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी निर्णय घ्यायचा आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाना पाठिंबा देणं हे आम्हाला गरजेचे आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाला आम्ही विरोध करणार नाही. म्हणून पवारांनी शंका व्यक्त केली असेल संजय शिरसाट म्हणाले की, अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा होते त्यांच्या शब्दाच्या आणि निर्णयाविरोधात जाण्याची कोणत्याही नेत्याची ताकद नव्हती. त्यांची शरद पवार किंवा इतर नेत्यांशी जी बैठक झाली आहे असे जे म्हणतात त्यात जो निर्णय झाला असता तो सर्वांनी मान्य केला असता. पण आता मला वाटते परिस्थिती आता बदललेली आहे. आता सामूहिक निर्णयाचे एक सामूहिक वारे राजकारणामध्ये सुरू झाले आहे म्हणून शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रीकरणाच्या चर्चेमध्ये खंड पडेल अशी शंका व्यक्त केली आहे. फडणवीस अन् आमची भूमिका एकच संजय शिरसाट म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रीकरण ही त्यांची पहिला भूमिका होती. यावर त्यांच्या पक्षाची चर्चा झाली, ते एकत्र आले असते तर ते केंद्रात एनडीए आणि राज्यात ते महायुतीमध्ये आले असते आणि त्याच पद्धतीचे राजकारण पुढे चालले असते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे नेते आहेत ते सुनेत्रा पवारांनाच पुढे करतील.
राजकारणात खुर्ची माणसापेक्षा महत्त्वाची:शासकीय दुखवटा संपण्यापूर्वी हे निर्णय व्हायला नको होते, मनाला न पटणारी गोष्ट- संजय शिरसाट
-
By सुरेश पाचभाई
- January 31, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
परिवहन विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार:बदल्या, बेकायदेशीर वसुलीचे...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 26, 2026
सोशल मीडियावर अश्लील क्लिप्स टाकणाऱ्यांना धक्का, ग्रुपच्या...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 26, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाशी उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 26, 2026
पार्थ पवारांना क्लीन चिट देता येणार नाही:राजकारणासाठी...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 26, 2026
राज्यात यलो अलर्ट, पुढचे चार दिवस धोक्याचे:मराठवाड्यातील...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 26, 2026
रुपाली चाकणकरांमुळे पक्षाची प्रतिमा धोक्यात:महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 26, 2026
राज्यभरात राम नवमीचा उत्साह:पुण्यात वाहतुकीतील बदल, काळाराम...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 26, 2026
