मुंबईच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे. पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून भांडुपमधील काँग्रेसच्या नगरसेविका आशा कोपरकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर एका महिलेचे अपहरण करून तिला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी भांडुप पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडुप प्रभाग क्रमांक 110 च्या काँग्रेस नगरसेविका आशा कोपरकर या मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कोपरकर यांच्या पत्नी आहेत. सुरेश कोपरकर यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय नगरसेविका आशा कोपरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना होता. याच संशयातून कोपरकर कुटुंबीयांनी या महिलेला धडा शिकवण्याचा कट रचला. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी तिला तिच्या राहत्या घरातून बळजबरीने उचलले आणि गाडीत टाकून तिचे अपहरण केले. जीवे मारण्याची धमकी महिलेचे अपहरण केल्यानंतर कोपरकर कुटुंबीयांनी तिला एका अज्ञात ठिकाणी नेऊन डांबून ठेवले. तिथे नगरसेविका आशा कोपरकर, त्यांच्या दोन मुली, जावई आणि मुलाने मिळून पीडित महिलेवर प्रश्नांचा भडीमार करत तिला अमानुषपणे मारहाण केली. एवढेच नव्हे तर, या घटनेबाबत तोंड उघडल्यास किंवा पोलिसांत गेल्यास ‘तुला जीवे मारू’, अशी गंभीर धमकीही या राजकीय कुटुंबाने पीडितेला दिली. या संपूर्ण गुन्ह्यात कोपरकर कुटुंबाच्या खाजगी चालकानेही त्यांना मदत केल्याचे समोर आले आहे. नगरसेविकेसह संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल या भयानक प्रसंगातून सुटका झाल्यानंतर पीडित महिलेने थेट भांडुप पोलिस ठाणे गाठून आपबिती सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने पावले उचलत नगरसेविका आशा कोपरकर, त्यांच्या दोन मुली, जावई, मुलगा आणि खाजगी चालक अशा सर्वांवर भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार अपहरण, बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला आहे.
Maharashtra
LIVE
पतीच्या अनैतिक संबंधाचा संशय, महिलेला घरातून उचलले, अज्ञात स्थळी डांबले:मुंबईतील काँग्रेस नगरसेविका आशा कोपरकर यांच्यासह संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
auto_awesomeथोडक्यात महत्त्वाचे
मुंबईच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे. पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून भांडुपमधील काँग्रेसच्या नगरसेविका आशा कोपरकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर एका महिलेचे अपहरण करून तिला अमानुष...
संबंधित बातम्या
संबंधित बातम्या
सर्व पहा
विद्यार्थी आत्महत्या म्हणजे व्यवस्थेने केलेले खून:सरकार किती खालची पातळी गाठणार? मनसेच्या अमित ठाकरे यांचा नीट पेपरफुटीवर संताप
6 hours पूर्वी
लाच प्रकरणात ग्रामसेवकाला जामीन मंजूर:सवना येथील घरकुलासाठी घेतली होती अडीच हजारांची लाच
7 hours पूर्वी
कल्याण रेल्वे स्टेशनवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार:पीडिता मुलगी मामाच्या घरी जात होती; लोकलची वाट पाहताना आरोपीने हेरले
7 hours पूर्वी
8500 उमेदवारांनी दिली SRPF ची लेखी परीक्षा:4 परीक्षा केंद्रांवर शांततेत परीक्षा, पण बॅगा ठेवण्याची सोय नसल्याने परीक्षार्थींची धावपळ
7 hours पूर्वी