Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

राज्याला स्थिरतेसाठी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री व्हाव्यात:शपथविधीसाठी किशोर जोरगेवार मुंबईकडे रवाना, चंद्रपुरात भाजप सत्ता स्थापनेचे प्रयत्न वेगात

भाजपच्या आमदारांनाही सुनेत्राताई पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी, अशी भावना व्यक्त होत असून, राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. पवार कुटुंबाचे आणि विशेषतः अजित पवार यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील योगदान निर्णायक राहिले असून, राज्याला स्थिर आणि सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री व्हाव्यात, असे मत भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल, त्याच निर्णयासोबत भाजप ठामपणे उभा राहील, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका हीच भाजपमधील सर्वांची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीच्या हालचाली सध्या सुरू असल्याचे वातावरण असून, त्याच पार्श्वभूमीवर आपण आज मुंबईला जात असल्याचे किशोर जोरगेवार यांनी सांगितले. सुनेत्रा पवार या मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याच्या चर्चा सुरू असून, त्यासाठीच मुंबईत उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आमदारांना अधिकृतपणे निमंत्रण दिले नसले तरी, अजित पवार आणि पवार कुटुंबाने आपल्याला राजकारणात नेहमीच साथ दिल्यामुळे त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य असल्याचे जोरगेवार यांनी नमूद केले. चंद्रपूरबद्दल फडणवीसांशी चर्चा करणार दरम्यान, चंद्रपूर शहराच्या राजकारणात सत्तास्थापनेच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. सोमवारी भाजपची अधिकृत गट नोंदणी होणार असून, त्यानंतर सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा होणार आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या सध्याच्या राजकीय स्थितीबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करण्यात येणार असून, पुढील रणनीती निश्चित केली जाणार असल्याचेही जोरगेवार यांनी सांगितले. काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत वाद, गटबाजी, तसेच हिंसक प्रकार सुरू असल्याचा आरोप करत, सध्याची परिस्थिती शांत होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याचे त्यांनी म्हटले. या पार्श्वभूमीवर भाजप चंद्रपुरात सत्ता स्थापनेसाठी ठोस पावले उचलत आहे. उबाठा गटानेही भाजपसोबत जाण्यात कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले असून, स्वतंत्र पक्ष असलेल्या उबाठाला सोबत घेऊन चंद्रपूरमध्ये भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!