राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात अकाली निधन झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. बारामतीमध्ये सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. बारामती येथे अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर अनेक ठिकाणी शोक सभांचे आयोजन करण्यात आले. बीड येथे झालेल्या शोकसभेत शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. साहेब आणि दादा आम्हाला वेगळे कधीच नव्हते, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. तसेच आपण पवार कुटुंबीयांच्या निर्णयासोबत राहणार असल्याचे क्षीरसागर यांनी म्हटले आहे. बीड येथे अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत संदीप क्षीरसागर यांना भावना अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. पवार कुटुंब एकत्र बसून जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही राहणार असल्याचे क्षीरसागर म्हणाले. साहेब आणि दादा आम्हाला वेगळे कधीच नव्हते, असे म्हणताना क्षीरसागर यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. संदीप क्षीरसागर म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी वेगळे झाले तेव्हा आम्ही साहेबांना म्हणत होतो की अजित दादांच्या हातात तुम्ही सूत्र द्या, आता देखील पवार कुटुंब एकत्र बसून जो निर्णय घेतील आम्ही त्या निर्णयासोबत आहोत. पवार कुटुंबाशिवाय आम्हाला काहीच दिसत नाही, असे क्षीरसागर म्हणाले. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबतच्या हालचाली सुरू अजित पवार यांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना राजकीय वर्तुळात वेग आला असून, पक्ष एकत्रीकरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय पवार कुटुंबीय लवकरच एकत्र बसून घेण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी झालेल्या प्राथमिक चर्चांमध्ये सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे आणि शशिकांत शिंदे यांसारख्या प्रमुख नेत्यांचा सहभाग होता. मात्र आता बदललेल्या परिस्थितीत संपूर्ण पवार कुटुंब या विषयावर सविस्तर विचारमंथन करणार असून, विलीनीकरणाबाबतचा अंतिम शब्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाच असेल, अशी माहिती समोर येत आहे. अजित पवार NCP एकीकरणासाठी सकारात्मक होते; जयंत पाटलांचा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांच्या एकीकरणाबाबत पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली असून, शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी यासंदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकत्र यावेत, हीच आपली सुरुवातीपासूनची भूमिका होती, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. अजित पवार यांच्या निधनानंतर प्रथमच एकीकरणाच्या मुद्द्यावर इतक्या ठाम शब्दांत प्रतिक्रिया देण्यात आल्याने, राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. वाचा सविस्तर
साहेब आणि दादा आम्हाला वेगळे कधीच नव्हते:अजित पवारांच्या आठवणीने संदीप क्षीरसागर यांना अश्रू अनावर; पवार कुटुंबासोबतच राहण्याचा निर्धार
-
By सुरेश पाचभाई
- January 30, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
झिशान सिद्दिकींच्या शपथेवरून राजकीय वादंग:इंग्रजीत शपथ म्हणजे...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 14, 2026
अजितदादांची झलक, जयदादांचा जनता दरबार:बारामतीत नागरिकांची मोठी...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 14, 2026
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्येचा फैसला लांबणीवर:पद्मसिंह पाटीलांसह...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 14, 2026
पिंपरी-चिंचवड हादरले!:आरपीआय कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल मोरेंची...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 14, 2026
परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत इंधन वाचवा:मोदींवर जितकी टीका...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 14, 2026
विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 10 आमदारांचा शपथविधी:सभापती राम...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 14, 2026
