वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अनुसूचित जाती आणि जमातीच्या (SC/ST) आरक्षणाच्या उप-वर्गीकरणावरून महाराष्ट्र सरकार आणि जस्टिस बदर समितीवर निशाणा साधला आहे. या समितीने तज्ज्ञ संस्था किंवा लोकांचा सहभाग न घेता केलेले वर्गीकरण अशास्त्रीय असल्याचे सांगत, हे विभाजन केवळ ‘कास्ट’ पद्धतीने न होता ‘इक्वल डिस्ट्रिब्यूशन’च्या तत्त्वावर व्हायला हवे होते, असे मत आंबेडकरांनी व्यक्त केले आहे. आरक्षणाच्या यादीत बदल करण्याचा अधिकार संसदेचा असताना सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावरही त्यांनी यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुप्रीम कोर्टाचा निर्णय वर्गीकरणाच्या संदर्भात लागला आहे. त्याला अनुसरून जस्टिस बदर साहेबांची एक समिती स्थापन करण्यात आली. आंध्र प्रदेशच्या जुन्या निर्णयाप्रमाणे वर्गीकरण करण्याचा जो अधिकार आहे हा राज्य शासनाचा नाही, तो पार्लियामेंटचा आहे असे त्या ठिकाणी नमूद करण्यात आले आहे. एससी एसटीची जी यादी आहे, त्या यादीत जो काहीही बदल करायचा असेल तर तो अधिकार पार्लियामेंटला आहे, पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने तो अधिकार घेतला आणि त्यांनी निर्णय दिला. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, वर्गीकरणाच्या संदर्भात कोणाच्याही मनात दुमत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु, ते वर्गीकरण कसे झाले पाहिजे? कास्ट पद्धतीने झाले पाहिजे. ज्या पद्धतीने जेएनयू सारख्या संस्था आहेत की त्या रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये सुद्धा आणि जनरल कॅटेगरीमध्ये सुद्धा काही प्रिन्सिपल्स पाळून इक्वल डिस्ट्रिब्यूशनच्या तत्त्वावर ते त्या ठिकाणी राबावतात, अशी परिस्थिती आहे. दुर्दैवाने मी असे म्हणेल की जस्टिस बदर यांची जी समिती आहे, या समितीने काही एक्स्पर्ट्स, संस्था किंवा लोकांचा सहभाग करून घेतला नाही. त्यांनी सरसकट डिविजन करून मोकळे झाले. हे डिविजन सायंटिफीक आहे की नाही अशी तपासणी करण्यात आलेली नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
SC-ST वर्गीकरणावरून प्रकाश आंबेडकरांची राज्य सरकारवर टीका:जस्टिस बदर समितीचा अहवाल ‘अवैज्ञानिक’ असल्याचा केला दावा
-
By सुरेश पाचभाई
- April 14, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
अशोक खरातचा एन्काउंटर होण्याची शक्यता:प्रणिती शिंदेंचा आरोप;...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 14, 2026
देशातील पहिली ‘ई-टीडीआर’ प्रणाली 15 एप्रिलपासून कार्यान्वित:टीडीआर...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 14, 2026
भोंदू अशोक खरातला 18 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी:गुंगीच्या...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 14, 2026
दादर हादरले!:पत्नीसमोरच पतीची बेदम मारहाण करून हत्या;...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 14, 2026
राऊत पीडित महिलांसोबत की भोंदू बाबासोबत?:बिल्डरांना रेड...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 14, 2026
डीजेच्या मिरवणुकीतून बाहेर या:डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीला राज...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 14, 2026
