मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र करण्यासंदर्भात अजित पवार यांनी का कल्पना दिली नाही हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. भाजपचा निर्णय त्यांच्या पक्षाचे नेते घेतील तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल त्यांच्या पक्षाचे नेते निर्णय घेतील. भाजपला सांगितले का नाही? त्यांना सांगितल्याशिवाय पुढचा काही कार्यक्रमच ठरत नाही का? मग हा पक्ष भाजप म्हणेल त्या पद्धतीने चालतो का? असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतात. पण एक खरे की दोन पक्ष एकत्र येऊ नये म्हणून हा कट कुठे तरी शिजला आणि त्यातून ही ठिणगी पडली असे मला वाटते असे मला वाटते, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, उपमुख्यमंत्रिपद हे संवैधानिक पद नाही त्यामुळे हे सर्व काही तेराव्यानंतर सुद्धा होऊ शकले असते. पण यामध्ये खूप काही शिजत आहे. अजित पवार यांची दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात अशी इच्छा होती असे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले, त्यांनी अजित पवार यांची शपथ सुद्धा घेतली. पण आता राजकारण फार सडके झालेले आहे. मला वाटते की राष्ट्रवादीचे पुढे काय होईल यावर आपण चर्चा न करता ते विधात्यावर सोडून द्यावे. गोयल यांनी अंदाज घेतला विजय वडेट्टीवार म्हणाले की, शरद पवार यांच्या जवळचे लोकं विलीनीकरणाबद्दल ठासून सांगत आहेत. त्यावरुन आता यावर आम्ही बोलण्यापेक्षा दोन्ही पक्षातील लोकांना काय ते ठाऊक आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊ नये हा कट कुठेतरी शिजला आणि त्यातून ही ठिंणगी पडली असे मला वाटते. पियुष गोयल यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचे वक्तव्य केले आणि अंदाज घेऊन पाहिला. निगेटिव्ह कमेंट आल्याने तो प्रस्ताव थांबवला. नाहीतर काय पटेल होऊन जातील असे सर्व नियोजन होते. विमान अपघाताबद्दल लोकांना संशय विजय वडेट्टीवार म्हणाले की, अजित पवार यांच्या विमानाचा अपघाताबद्दल राज्यातील 80 टक्के लोक संशय व्यक्त करत आहेत. सोशल मिडीयावर आपण सर्व जण पाहतोय की लोकं बोलताय हा अपघात नाही तर घातपात आहे. सहावी बॉडी कुठे गेली? वेळेवर पायलट का बदलला गेला हा सुद्धा प्रश्न आहे. ज्या पायलटचे नाव पुढे आला होता तो जिवंत आहे. कारण तो वेळेवर पोहचू शकला नाही किंवा त्यांच्या ऐवजी कपूर नावाच्या दुसऱ्या पायलेटला तिथे पाठवले. पण एक नक्की की दाल मे कुछ काला लगता है. याची चौकशी होणं गरजेचे आहे. मंत्री स्वत:ला राजे समजताय विजय वडेट्टीवार म्हणाले की, नाही आता नवीन राजे गेलेत आणि हे राजे आलेत स्वत:ला राजे म्हणून घेणाऱ्या लोकांना सरकारचा पैसा आणि मिळकत त्यांची वाटते. खुर्ची आणि सत्ता राजेशाहीप्रमाणे राबवण्याची पद्धत आता वाढीस लागली आहे त्यातूनच असे मंत्री काही वक्तव्य करत करत आहे. ते सेवक आहेत मालक नाहीत. त्यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य केले जातात.नीतेश राणे यांनी काल एक वक्तव्य केले की मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत. मी जे सांगेल तेच होईल असे वक्तव्य केले होते यावर बोलताना वडेट्टीवार यांनी टोला लगावला आहे.
