उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता अजित पवार कुटुंबातील सदस्य प्रथमच जाहीरपणे आपली भूमिका मांडणार आहेत. अजितदादांचे सुपुत्र जय पवार उद्या (9 तारीख) पत्रकार परिषद घेणार होते. पण त्यांची उद्याची पत्रकार परिषद काही कारणांमुळे लांबणीवर टाकण्यात आली आहे. यापूर्वी जय पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली होती, मात्र आता ते प्रत्यक्ष माध्यमांसमोर येत असल्याने चर्चांना उधाण आले आहे. जय पवार यांनी यापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. विमान अपघातात ‘ब्लॅक बॉक्स’ इतक्या सहजपणे नष्ट होऊ शकत नाही, असा दावा त्यांनी केला होता. या अपघाताचे ‘निर्विवाद सत्य’ बाहेर आलेच पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. DGCA ला उद्देशून केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी VSR कंपनीची सर्व विमाने तात्काळ ‘ग्राउंड’ करण्याची आणि रोहित सिंह यांना अटक करण्याची मागणी केली होती. ही ‘एका मुलाची आर्त हाक’ असल्याचे त्यांनी म्हटले होते.
अहवाल हाती आल्यावर बोलणं योग्य दुसरीकडे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या प्रकरणावर भाष्य केले आहे. अनेक एजन्सीमार्फत चौकशी सुरू आहे. सध्या जो अहवाल समोर आला आहे, तो केवळ ‘प्राथमिक’ आहे, तो पूर्ण नाही. सर्व अहवाल हाती आल्यानंतरच यावर सविस्तर बोलणे योग्य ठरेल, असे सांगत त्यांनी संयमी पण महत्त्वाची भूमिका मांडली आहे. रोहित पवारांकडून नेत्यांच्या भेटी यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी सातत्याने हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत पुरावे मांडण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला शरद पवारांनी हा केवळ अपघात असल्याचे म्हटले होते, मात्र रोहित पवारांच्या दाव्यांनुसार, शरद पवारांचे विधान हे केवळ त्यावेळची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी होते. रोहित पवारांनी राज्यातील मविआतील नेत्यांसह राज ठाकरेंची भेट या संदर्भात संपूर्ण माहिती दिली. तर गेली 2 दिवस ते दिल्लीत असून दिल्लीतील विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेट अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी चर्चा करत त्यांनी हा मुद्दा संसदेत मांडावे अशी विनंती करत आहेत.
