महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या आधी राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. अजित पवार यांच्या अपघातानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे. तर सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातील पहिलेच अधिवेशन असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला होता. त्यामुळे हे अधिवेशन चांगलेच वादळी ठरण्याची शक्यता आहे.
