आजच्या काळात पुस्तकी ज्ञानासोबतच व्यावहारिक शिक्षण किती महत्त्वाचे आहे, याचे उत्तम उदाहरण लाखांदुर तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेने घालून दिले आहे. खैरी (घर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या परसबागेत पिकवलेला भाजीपाला थेट आठवडी बाजारात विकून हजारो रुपयांची कमाई केली आहे. परसबागेतून उद्योजकतेकडे शाळेतील पोषण आहार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या परिसरातच परसबाग फुलवली होती. या बागेतून पोषण आहारासाठी आवश्यक भाजीपाला वापरल्यानंतर, उर्वरित मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या वांगी, टोमॅटो, कोबी आणि मुळा यांसारख्या भाज्यांची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. लाखांदुर तालुक्यातील मासळ येथील आठवडी बाजारात या बाल विद्यार्थ्यांनी आपल्या भाज्यांची छोटीशी दुकान थाटली. गणवेशात बसलेल्या या चिमुकल्या विक्रेत्यांकडे पाहून ग्राहकांमध्येही प्रचंड कुतूहल निर्माण झाले होते. ‘केमिकलमुक्त’ आणि ‘ताज्या’ भाज्या असल्याने ग्राहकांनीही त्यांना भरघोस प्रतिसाद दिला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ भाजी विकली नाही, तर हिशोब करण्याची कला आत्मसात केली. यातून विद्यार्थ्यांनी ग्राहकांशी संवाद साधण्याचे कौशल्य शिकले. कष्टाचे महत्त्व आणि उद्योजकतेची पहिली पायरी अनुभवली. दिवसभराच्या या विक्रीतून विद्यार्थ्यांनी हजारो रुपयांचा नफा मिळवला. हा निधी शाळेच्या विकासकामांसाठी किंवा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमांसाठी वापरण्यात येणार असल्याचे समजते. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, “शिकणारा शेतकरी आणि स्वावलंबी विद्यार्थी” अशी नवी ओळख या मुलांनी निर्माण केली आहे. प्रत्यक्ष अनुभवातून मिळणारे शिक्षण महत्त्वाचे – सरपंच दुसरीकडे, खैरी (घर) च्या सरपंच सौ. वर्षा सेवक कोरे यांनी या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेले शिक्षण आयुष्यभरासाठी उपयोगी ठरणार असल्याची भावना व्यक्त केली आहे. केवळ वर्गात बसून शिक्षण मिळत नाही, तर प्रत्यक्ष अनुभवातून जे शिक्षण मिळते ते आयुष्यभरासाठी उपयोगी ठरते. आमच्या विद्यार्थ्यांनी आज ते सिद्ध केले, असे त्या म्हणाल्यात.
चिमुकल्या हातांनी पिकवली अन् विकलीही भाजी!:भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा आगळावेगळा ‘बाजार’
-
By सुरेश पाचभाई
- February 24, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंच्या अपघातावर संशय:कंटेनर...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 18, 2026
अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे अखेर निलंबन:15 हजारांच्या खंडणीचा...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 18, 2026
सरकारकडून स्टेनोग्राफर पद मृत घोषित:राज्यातील हजारो तरुणांची...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 18, 2026
मुंढवा जमीन घोटाळ्यात ट्विस्ट!:पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे शीतल तेजवानीला...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 18, 2026
सध्याच्या 543 जागांवरच महिला आरक्षण द्या:प्रियांका चतुर्वेदींकडून...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 18, 2026
सत्यशोधकी जलशांचा वारसा हरवला:शाहीर रामदास गुंड यांचे...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 18, 2026
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंविरुद्ध जामीनपात्र...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 18, 2026
