आजच्या काळात पुस्तकी ज्ञानासोबतच व्यावहारिक शिक्षण किती महत्त्वाचे आहे, याचे उत्तम उदाहरण लाखांदुर तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेने घालून दिले आहे. खैरी (घर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या परसबागेत पिकवलेला भाजीपाला थेट आठवडी बाजारात विकून हजारो रुपयांची कमाई केली आहे. परसबागेतून उद्योजकतेकडे शाळेतील पोषण आहार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या परिसरातच परसबाग फुलवली होती. या बागेतून पोषण आहारासाठी आवश्यक भाजीपाला वापरल्यानंतर, उर्वरित मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या वांगी, टोमॅटो, कोबी आणि मुळा यांसारख्या भाज्यांची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. लाखांदुर तालुक्यातील मासळ येथील आठवडी बाजारात या बाल विद्यार्थ्यांनी आपल्या भाज्यांची छोटीशी दुकान थाटली. गणवेशात बसलेल्या या चिमुकल्या विक्रेत्यांकडे पाहून ग्राहकांमध्येही प्रचंड कुतूहल निर्माण झाले होते. ‘केमिकलमुक्त’ आणि ‘ताज्या’ भाज्या असल्याने ग्राहकांनीही त्यांना भरघोस प्रतिसाद दिला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ भाजी विकली नाही, तर हिशोब करण्याची कला आत्मसात केली. यातून विद्यार्थ्यांनी ग्राहकांशी संवाद साधण्याचे कौशल्य शिकले. कष्टाचे महत्त्व आणि उद्योजकतेची पहिली पायरी अनुभवली. दिवसभराच्या या विक्रीतून विद्यार्थ्यांनी हजारो रुपयांचा नफा मिळवला. हा निधी शाळेच्या विकासकामांसाठी किंवा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमांसाठी वापरण्यात येणार असल्याचे समजते. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, “शिकणारा शेतकरी आणि स्वावलंबी विद्यार्थी” अशी नवी ओळख या मुलांनी निर्माण केली आहे. प्रत्यक्ष अनुभवातून मिळणारे शिक्षण महत्त्वाचे – सरपंच दुसरीकडे, खैरी (घर) च्या सरपंच सौ. वर्षा सेवक कोरे यांनी या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेले शिक्षण आयुष्यभरासाठी उपयोगी ठरणार असल्याची भावना व्यक्त केली आहे. केवळ वर्गात बसून शिक्षण मिळत नाही, तर प्रत्यक्ष अनुभवातून जे शिक्षण मिळते ते आयुष्यभरासाठी उपयोगी ठरते. आमच्या विद्यार्थ्यांनी आज ते सिद्ध केले, असे त्या म्हणाल्यात.
चिमुकल्या हातांनी पिकवली अन् विकलीही भाजी!:भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा आगळावेगळा ‘बाजार’
-
By सुरेश पाचभाई
- February 24, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
मंत्र्यांनी लक्षवेधीवर बोलताना अभ्यास करून यावे:नुसते बघतो,...
0views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 24, 2026
सरकारची ड्रग्ज बाबत ‘झिरो टॉलरन्स’ पॉलिसी:ड्रग्ज तस्करीत...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 24, 2026
ओबीसी आरक्षणासाठी 50% मर्यादा हटवा, घटनादुरुस्ती करा:बबनराव...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 24, 2026
डिजिटल इंडियाच्या गप्पा अन् जीवघेणा प्रवास:वैनगंगेवरील ‘ईटान-कोलारी’...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 24, 2026
जिल्हा परिषद, पंचाय समितीचे कामकाज ठप्प:हिंगोली जिल्ह्यात...
0views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 24, 2026
विदर्भासाठी राज्य सरकारचे मोठे गिफ्ट:वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 24, 2026
सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने सरकारी तिजोरीवर दरोडा:1985 मध्ये जन्मलेल्या...
0views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 24, 2026
अधिवेशनात विक्रम काळेंचा संताप:शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांवरून खडाजंगी;...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 24, 2026
