मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आपल्या विरोधात स्टिंग ऑपरेशनचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मी गरिबांसाठी काम करतो, म्हणून माझ्याविरोधात योजना आखली जात आहे. मंत्रालयातच काही हालचाली सुरू आहेत, असा दावा त्यांनी केला. हिंगोली जिल्ह्यातील कामठा फाटा येथे शिवजयंती 2026 निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जरांगे म्हणाले की, येत्या चार ते पाच दिवसांत मुंबईत मोठी खेळी होणार आहे. त्या कटात एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती मला मिळाली आहे. स्टिंग ऑपरेशनची तयारी सुरू आहे. मात्र आम्हीही काही कमी नाही. आमची यंत्रणा देखील सतर्क आहे. नाव न घेता त्यांनी संबंधितांना इशारा दिला. मी कोणासाठी काम करतो? तर फक्त गरिबांच्या लेकरांसाठी. त्यामुळे मला घाबरवण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या आरोपांमुळे त्यांच्या रोख नेमका कोणाकडे आहे, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र त्यांनी कोणत्याही व्यक्तीचे नाव घेतले नाही. कट का रचला जातोय, हे सर्वांना माहीत आहे. मी सामाजिक प्रश्नांवर उभा राहतो, शेतकरी आणि वंचितांसाठी आवाज उठवतो. त्यामुळे काहींना ते खटकत असावे, असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने सभेत उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधातील शेतकऱ्यांची भेट दरम्यान, परभणीत शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांचीही जरांगे यांनी भेट घेतली. शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आपलं म्हणणं ठामपणे सरकारदरबारी मांडलं पाहिजे, असे ते म्हणाले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी त्यांनी फोनवरून चर्चा केली असून शेतकऱ्यांची मंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जर शेतकऱ्यांना जमीन द्यायची नसेल, तर सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, कोणत्याही विकासकामासाठी लोकांचा विश्वास महत्त्वाचा असतो. जमिनीचा प्रश्न हा भावनिक आणि आर्थिक दोन्ही स्तरांवर महत्त्वाचा आहे. सरकारने संवाद साधून निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले. परभणीतील शेतकरी मागील काही दिवसांपासून आंदोलन करत असून त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे जरांगे यांनी नमूद केले. घाबरणार नाही, सत्य आणि न्यायासाठी लढत राहू अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत विचारले असता जरांगे यांनी संतुलित भूमिका मांडली. पवार कुटुंबीयांना जर सखोल चौकशी हवी असेल, तर ती झालीच पाहिजे. सध्या जी माहिती समोर येत आहे, त्यावरून अनेकांच्या मनात शंका निर्माण होत आहेत. सत्य बाहेर येणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. कोणताही निष्कर्ष गाठण्यापूर्वी तपास पूर्ण होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. एकूणच, हिंगोलीतील भाषणातून जरांगे यांनी दोन मुद्द्यांवर ठाम भूमिका घेतली, एक म्हणजे स्वतःविरोधात कट रचला जात असल्याचा आरोप आणि दुसरे म्हणजे शेतकरी व सामाजिक प्रश्नांवर लढा सुरू ठेवण्याचा निर्धार. आम्ही घाबरणार नाही. सत्य आणि न्यायासाठी लढत राहू, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. त्यांच्या या वक्तव्यांमुळे पुढील काही दिवसांत राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबईत माझ्याविरोधात कट, स्टिंग ऑपरेशनमध्ये महिलेचा सहभाग:कट का रचला जातोय, हे सर्वांना माहीत; मनोज जरांगे यांचा स्फोटक दावा
-
By सुरेश पाचभाई
- February 26, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे बुलढण्यात जाहीर वाचन:संजय...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 23, 2026
राहुरी मतदानाच्या दिवशीच प्राजक्त तनपुरेंची स्पष्ट भूमिका:भाजप...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 23, 2026
सप्तशृंगी गडावर 22 किलो चांदीचा अपहार!:जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 23, 2026
मध्य रेल्वेचा यू-टर्न, अमित ठाकरेंच्या इशाऱ्याने निर्णय...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 23, 2026
