महापालिकेमध्ये जर विकासाचे मुद्दे बाजूला सारले जात असतील तिथे धार्मिक मुद्दे पुढे येत असतील तर महाराष्ट्र अशांत होण्यास काही वेळी लागणार नाही. कुणी काय करावे हा त्यांचा निर्णय आहे, सरकारने कायदा आणावा किंवा काहीही करावे आम्ही त्यावर चर्चा करावे पण राज्यात दरी निर्माण होऊ नये याची काळजी घेणं गरजेचे आहे, कायद्यापेक्षा लोकांच्या मनात परिवर्तन आणले पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. तर मालेगाव सारख्या घटना कशा घडणार नाही यासाठी काही तरी करणे गरजेचे आहे. शशिकांत शिंदे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील आणि सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सातत्य ठेवले पाहिजे. सातत्य राहिले तरच त्यावर निर्णय होईल. निवडणुकीपुरते सरकार त्यांना आश्वासान देते आणि नंतर विसरते. हैदराबाद, सातारा गॅझेटचा निर्णय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा झालेला आहे, तेव्हापासून ते झाले नाही हे दुर्दैवी आहे. सभागृहात मुद्दा मांडणार शशिकांत शिंदे म्हणाले की, अजित पवार विमान अपघात संदर्भात काल मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात आमदार रोहित पवार आणि आमचे पदाधिकारी गेले होते त्यांनी गुन्हा दाखल करण्याची विंनती केली होती. आज ते बारामतीमध्ये जाऊन गुन्हा दाखल करण्याची विंनती करणार आहे. सभागृहात सुद्धा आम्ही मुद्दा मांडणार असून स्थगन किंवा इतर माध्यमातून सरकारला स्पष्टीकरण द्यायला लावू. ब्लॅक बॉक्स बद्दल माहिती नाही शशिकांत शिंदे म्हणाले की, अजित पवार यांच्या विमान अपघातामधील ब्लॅक बॉक्स बद्दल माहिती नाही, त्यावर फक्त चर्चा होत आहे, त्याबद्दल काही माहिती दिली जात नाही. काही जण म्हणताय की ब्लॅक बॉक्स जळाला आहे, काही जण म्हणताय सुरक्षित आहे, या वावड्यावर काहीतरी निर्णय घेणं गरजेचे आहे. अपघात प्रकरणी VSR वर एफआयआर दाखल करत कारवाई करावी त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे ही मागणी आहे. यात चुकीचे असे काहीच नाही कुणी त्याचा चुकीचा अर्थ लावू नये. आता यावर पोलिस आणि गृहखाते काय करते हे आम्हाला बघायचे आहे. मविआची चर्चा सुरू शशिकांत शिंदे म्हणाले की, राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या एका जागेसाठी आमची चर्चा सुरू आहे. सभागृहाच्या कामकाजासंदर्भात आमच्या आमदारांची बैठक आहे, शरद पवार कालच मुंबईत आले आहेत, दोन दिवसांमध्ये चर्चा करत निर्णय घेतला जाईल.
धार्मिक मुद्द्यांमुळे राज्य अशांत होईल:मनपात विकासाऐवजी धर्मावर चर्चा झाल्यास दरी निर्माण होईल, सरकार निवडणुकीपुरते आश्वासन देऊन मराठा आरक्षण विसरते- शशिकांत शिंदे
-
By सुरेश पाचभाई
- February 26, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
अमेरिका आता स्वतःच ‘नरक’ बनलीये:डोनाल्ड ट्रम्प यांच्या...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 26, 2026
राज्यातील आरोग्य समित्यांचे होणार पुनरुज्जीवन:सर्वसामान्यांना मिळणार दर्जेदार...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 26, 2026
गोऱ्हेंना विधान परिषदेची उमेदवारी नकोच!:24 वर्ष आमदार...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 26, 2026
धीरेंद्र शास्त्रींच्या विधानानंतर ‘सह्याद्री’ आक्रमक:’आम्हाला शिवराय शिकवू...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 26, 2026
पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर:आता मेन्युकार्डवर ‘पनीर’...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 26, 2026
माढ्यात विवाहितेचा विजेच्या धक्क्याने संशयास्पद मृत्यू:शिक्षक पतीवर...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 26, 2026
श्याम मानव सध्या केवळ प्रसिद्धीसाठीच बोलतात:मुख्यमंत्र्यांनी माजी...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 26, 2026
