Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

धार्मिक मुद्द्यांमुळे राज्य अशांत होईल:मनपात विकासाऐवजी धर्मावर चर्चा झाल्यास दरी निर्माण होईल, सरकार निवडणुकीपुरते आश्वासन देऊन मराठा आरक्षण विसरते- शशिकांत शिंदे

महापालिकेमध्ये जर विकासाचे मुद्दे बाजूला सारले जात असतील तिथे धार्मिक मुद्दे पुढे येत असतील तर महाराष्ट्र अशांत होण्यास काही वेळी लागणार नाही. कुणी काय करावे हा त्यांचा निर्णय आहे, सरकारने कायदा आणावा किंवा काहीही करावे आम्ही त्यावर चर्चा करावे पण राज्यात दरी निर्माण होऊ नये याची काळजी घेणं गरजेचे आहे, कायद्यापेक्षा लोकांच्या मनात परिवर्तन आणले पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. तर मालेगाव सारख्या घटना कशा घडणार नाही यासाठी काही तरी करणे गरजेचे आहे. शशिकांत शिंदे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील आणि सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सातत्य ठेवले पाहिजे. सातत्य राहिले तरच त्यावर निर्णय होईल. निवडणुकीपुरते सरकार त्यांना आश्वासान देते आणि नंतर विसरते. हैदराबाद, सातारा गॅझेटचा निर्णय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा झालेला आहे, तेव्हापासून ते झाले नाही हे दुर्दैवी आहे. सभागृहात मुद्दा मांडणार शशिकांत शिंदे म्हणाले की, अजित पवार विमान अपघात संदर्भात काल मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात आमदार रोहित पवार आणि आमचे पदाधिकारी गेले होते त्यांनी गुन्हा दाखल करण्याची विंनती केली होती. आज ते बारामतीमध्ये जाऊन गुन्हा दाखल करण्याची विंनती करणार आहे. सभागृहात सुद्धा आम्ही मुद्दा मांडणार असून स्थगन किंवा इतर माध्यमातून सरकारला स्पष्टीकरण द्यायला लावू. ब्लॅक बॉक्स बद्दल माहिती नाही शशिकांत शिंदे म्हणाले की, अजित पवार यांच्या विमान अपघातामधील ब्लॅक बॉक्स बद्दल माहिती नाही, त्यावर फक्त चर्चा होत आहे, त्याबद्दल काही माहिती दिली जात नाही. काही जण म्हणताय की ब्लॅक बॉक्स जळाला आहे, काही जण म्हणताय सुरक्षित आहे, या वावड्यावर काहीतरी निर्णय घेणं गरजेचे आहे. अपघात प्रकरणी VSR वर एफआयआर दाखल करत कारवाई करावी त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे ही मागणी आहे. यात चुकीचे असे काहीच नाही कुणी त्याचा चुकीचा अर्थ लावू नये. आता यावर पोलिस आणि गृहखाते काय करते हे आम्हाला बघायचे आहे. मविआची चर्चा सुरू शशिकांत शिंदे म्हणाले की, राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या एका जागेसाठी आमची चर्चा सुरू आहे. सभागृहाच्या कामकाजासंदर्भात आमच्या आमदारांची बैठक आहे, शरद पवार कालच मुंबईत आले आहेत, दोन दिवसांमध्ये चर्चा करत निर्णय घेतला जाईल.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!