पालघर जिल्ह्यातील सूर्या धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या चंद्रानगर आणि हनुमाननगर येथील आदिवासी बांधवांचा तब्बल 45 वर्षांचा वनवास आता संपणार असून त्यांना जमिनीचा मालकी हक्क मिळणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करताना सांगितले की, पुढील एका महिन्याच्या आत उर्वरित सर्व 205 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सात-बारा उतारे आणि जमिनीच्या नकाशांचे अधिकृत वाटप करण्यात येईल. गेली साडेचार दशके जमिनीच्या प्रतीक्षेत असलेल्या या धरणग्रस्त आदिवासी कुटुंबांना सरकारच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या संघर्षाला अखेर यश आले आहे. पालघर जिल्ह्यातील सूर्या धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या 11 गावांतील प्रकल्पग्रस्तांच्या 45 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांकडे आमदार राजेंद्र गावित यांनी विधानसभेत लक्ष वेधले. चंद्रनगर आणि हनुमाननगर या दोन गावांतील रहिवाशांचे पुनर्वसन झाले असले तरी, अद्याप अनेक शेतकऱ्यांना सातबारा उतारे, गाव नकाशे, चतुर्सीमा आणि जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे, मालकी हक्काचे सातबारा उतारे नसतानाही या भागातील जमिनी वाढवण बंदर आणि बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हक्काचे सातबारा उतारे आणि प्रलंबित मोबदला नेमका कधी मिळणार, असा सवाल करत त्यांनी प्रशासकीय दिरंगाईवर ताशेरे ओढले. यावर बोलताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, या प्रकरणात एकूण 467 खातेदार आहेत. त्यापैकी 262 खातेदारांना सातबारा उतारे आधीच देण्यात आले असून उर्वरित सुमारे 200 हून अधिक शेतकरी अद्याप बाकी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात जमिनींचे स्पष्ट सीमांकन झालेले नसल्यामुळे काही ठिकाणी क्षेत्रफळात बदल झाले आहेत. काही शेतकऱ्यांच्या जमिनी इतरांच्या क्षेत्रात गेल्या आहेत, तर काही ठिकाणी अतिक्रमणाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सर्व जमिनींचे पुन्हा सीमांकन करून अचूक नकाशे तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, नकाशे तयार करण्याचे काम पूर्ण करून उर्वरित शेतकऱ्यांना महिनाभराच्या आत सातबारा उतारे व संबंधित नकाशे देण्यात येतील. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाढवण बंदर आणि बुलेट ट्रेन प्रकल्पात संपादित झाल्या आहेत, त्यांना त्यांचा मोबदला देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येईल. या प्रक्रियेमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागेल, असेही त्यांनी म्हटले.
सूर्या धरणग्रस्तांचा 45 वर्षांचा वनवास संपला!:205 प्रकल्पग्रस्तांना महिनाभरात मिळणार जमिनीचा मालकी हक्क, महसूलमंत्र्यांची घोषणा
-
By सुरेश पाचभाई
- March 4, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे बुलढण्यात जाहीर वाचन:संजय...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 23, 2026
राहुरी मतदानाच्या दिवशीच प्राजक्त तनपुरेंची स्पष्ट भूमिका:भाजप...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 23, 2026
सप्तशृंगी गडावर 22 किलो चांदीचा अपहार!:जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 23, 2026
मध्य रेल्वेचा यू-टर्न, अमित ठाकरेंच्या इशाऱ्याने निर्णय...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 23, 2026
