भारतात वन नेशन, वन टॅक्स या संकल्पनेंतर्गत जीएसटी व्यवस्था लागू करण्यात आली. त्यानंतर अनेक राज्यांनी आपल्या सीमांवरील चेकपोस्ट बंद केल्या. पण महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात आजही चेकपोस्ट सुरू असून, तिथे पोलिस व आरटीओ खात्यातील काही घटक अवैध वसुली करत आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी आज विधानसभेत केला. या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाी करण्यात यावी, असे ते म्हणालेत. नाना पटोले आज विधानसभेत लक्षवेधीच्या मुद्यावर बोलताना म्हणाले, देशपातळीवर कायदा लागू झाल्यानंतर महाराष्ट्रानेही त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्या काळात करचोरी रोखण्यासाठी आणि राज्य उत्पादन शुल्कासह इतर विभागांमध्ये होणारे मोठ्या प्रमाणातील गैरव्यवहार थांबवण्यासाठी राज्याच्या सीमांवर सर्वत्र चेकपोस्ट उभारण्यात आले. या चेकपोस्टच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीचे होणारे नुकसान थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. नंतर मात्र “वन नेशन, वन टॅक्स” या संकल्पनेअंतर्गत जीएसटी व्यवस्था लागू करण्यात आली. जीएसटी लागू झाल्यानंतर देशातील अनेक राज्यांनी आपल्या सीमांवरील चेकपोस्ट बंद केल्या. परंतु महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आजही या चेकपोस्ट सुरू आहेत. प्रत्यक्षात या चेकपोस्टवर मोठ्या प्रमाणात गोंधळाचे वातावरण असते. काही ठिकाणी दलालांचे जाळे तयार झाले असून तेथे अक्षरशः लूट सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. पोलिस, आरटीओच्या घटकांकडून अवैध वसुली पोलिस विभाग आणि RTO विभागातील काही घटकांकडून या माध्यमातून वसुली सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. मी विधानसभा अध्यक्ष असताना अशा अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या. त्या संदर्भात संबंधित आयुक्तांशी चर्चा केली असता त्यांनी ही व्यवस्था काही काळापुरतीच असल्याचे सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात सरकार या चेकपोस्टसाठी करार वाढवण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व प्रकारामुळे निर्माण झालेला सावळा गोंधळ आणि सुरू असलेली वसुली थांबवण्यासाठी राज्य सरकार या चेकपोस्ट बंद करणार का? असा सवाल नाना पटोलेंनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सभागृहात उपस्थित केला. मंत्र्यांच्या सभागृहातील गैरहजेरीवरही संताप नाना पटोलेंनी गुरुवारी सभागृहातील मंत्र्यांच्या गैरहजेरीवर तीव्र संताप व्यक्त केला होता. ते म्हणाले, आज (गुरुवार) संसदीय मंत्री महोदयांनी सभागृहात नियमावलीबाबत मार्गदर्शन केले. परंतु सभागृहात उपस्थित राहण्याची जबाबदारी असतानाही संसदीय मंत्री सभागृहात खूप कमी वेळ दिसून येतात. आज आम्ही अध्यक्ष महोदयांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली की, ज्या विभागांच्या मागण्या कामकाजात मांडल्या जातात, त्या संबंधित विभागांचे मंत्री अनेकदा सभागृहात उपस्थित नसतात. सभागृहातील ही परिस्थिती चिंताजनक आहे, असे ते म्हणाले होते.
सीमावर्ती चेकपोस्टवर दलालांचे जाळे:पोलिस अन् RTO मधील काही घटकांकडून अवैध वसुली, नाना पटोलेंची कारवाईची मागणी
-
By सुरेश पाचभाई
- March 13, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
मुंबईच्या प्रदूषणावर दीपिका पादुकोण आक्रमक:लहान मुलं गुदमरतायत…हे...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 13, 2026
मराठी कलाकारांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत घेतले मनसेचे...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 13, 2026
परीक्षा हॉलमध्ये घुसून दहावीच्या विद्यार्थिनीला मारहाण:बीडच्या डोईठाण...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 13, 2026
इराणचा तेलवाहू जहाजावर हल्ला:अमेरिकेच्या ‘सेफसी विष्णू’वरील भारतीय...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 13, 2026
अजित पवारांप्रमाणेच सुनेत्रा पवारांचा जनता दरबार:महिलांसह नागरिकांच्या...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 13, 2026
हॉटेल व्यवसाय चुलीवर:मुंबई, संभाजीनगरसह प्रमुख शहरांतील हॉटेलांत...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 13, 2026
‘बाबा सरेंडर, दे सिलिंडर!:पंतप्रधानांनी अमेरिकेसमोर गुडघे टेकले,...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 13, 2026
