भाजपने सर्व काही अदानींना विकले फक्त काही नदी नाले शिल्लक होते त्यातील मिठी नदी, मोदींनी जी योजना सांगितली आहे की गटारातून गॅस काढला पाहिजे, ही मिठी नदीच्या माध्यमातून साकार होऊ शकते. आता गटारांची किंमत आता वाढली आहे. मोदींच्या कृपेने नदी, नाले, गटारांची किंमत वाढली आहे, असा पंतप्रधान जगात झाला नाही, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, भाजपकडून गटारांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करा अशी सांगण्याची स्थिती दिसते आहे. आम्ही मोदींच्या योजनेला पाठिंबा देत आहोत. भाजप मोदी यांच्या विरोधात कधीपासून जात आहे? नरेंदर अन् सिलिंडर भी गायब अशी घोषणा संसदेत गाजत आहे. यापुढे नरेंद्र मोदी संसदेत येतील असे वाटत नाही कारण त्यांना तोंड दाखवायला जागा नाही. मोदी यावर बोलत नाही संजय राऊत म्हणाले की, अखाती देशातील युद्धामुळे भारताला अत्यंत गंभीर परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. पण सरकारकडून त्या संदर्भात अफवा पसरवल्या जात आहेत की सर्व काही अलबेल आहे. एलपीजीची टंचाई अजिबात पडणार नाही, भारत सर्व परिस्थितीशी तोंड द्यायला सक्षम आहे. कुठेही सिलिंडरचे भाव वाढणार नाही. या अफवा महाराष्ट्राचे आणि केंद्राचे सरकार पसरवत आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू अशा राज्यात प्रचारात अडकलेले आहे. त्यांच्या प्रचार सभेतील कोणत्याही भाषणात या विषयाचा उल्लेख नाही. एलपीजी अभावी अनेक हॉटेल्स बंद संजय राऊत म्हणाले की, सिलिंडरसाठी रांगा लागलेल्या आहेत. 25 दिवस सिलिंडर मिळणार नाही असे चित्र आहे. अनऑर्गनाईज लेबर जाक हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहे ती हॉटेल इंडस्ट्री 40 टक्के बंद झाली आहे. मुंबईसारख्या मोठ्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये एलपीजी अभावी हॉटेल्स बंद आहेत, त्यामुळे रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री एक शब्द बोलत नाही, लोकांनी काय करायचे.नोटबंदीच्या वेळी लाइनमध्ये लोकं मारली गेली. तेच सिलिंडरच्या रांगेत होईल अशी परिस्थिती देशभरात झाल्याचे दिसते आहे. हे सरकार जनताविरोधी संजय राऊत म्हणाले की, हे सरकार जनताविरोधी आहे.आंतरराष्ट्रीय राजकारणात अपयशी ठरल्याने आपल्या देशावर ही परिस्थिती ओढावली आहे. इराणकडून संवाद झाला असे सांगितले जात नाही. केंद्र सरकारकडून अफव पसरवल्या जात आहेत. इराणसोबत संवाद साधला गेला पाहिजे. इराणला नैतिक पाठबळ देणं गरजेचे आहे. युद्ध युद्धांच्या ठिकाणी आहे, पण आपण तटस्थ भूमिका घेणे गरजेचे होते. इराणच्या दुखात सहभागी होणं गरजेचे होते. केवळ तेलाचे टँकर सोडा इतकाच आपला संबंध आहे का तर नाही? असे राऊतांनी म्हटले आहे.
भाजपने अदानींना सर्व काही विकले:आता गटारांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करा, नरेंदर अन् सिलिंडर दोन्ही गायब – संजय राऊत
-
By सुरेश पाचभाई
- March 14, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
गॅस सिलिंडरसाठी लोकांनी रांगा लावाव्यात, त्यासाठी पॅनिक...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 14, 2026
संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंना संपवण्याची सुपारी घेतली...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 14, 2026
मुलीची लग्नपत्रिका वाटून परताना काळाचा घाला:गिट्टीने भरलेला...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 14, 2026
गॅस पुरवठ्याची नियमावली जारी:शैक्षणिक संस्थांना 100%, इतरांना...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 14, 2026
वि’चित्रा’ ताईंनी सवयीप्रमाणे नाक खुपसले:गॅस मिळेपर्यंत सामान्यांनी...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 14, 2026
बुलढाण्यात रुग्णालयातून सिलिंडरच लंपास:गॅससाठी रांगा, पण चोरट्याची...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 14, 2026
