Skip to content
ब्रेकिंग न्यूज:
हिवरा शिवारात विजेचा थरारक कहर! | राज्याच्या विकासकामासाठी दिल्लीत आलो होतो:जल जीवन मिशन, कांदो, साखर प्रश्नांवर बैठका झाल्या – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे | डिझेल अभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने बाळाचा मृत्यू:नातेवाईकांचा आरोप, आरोग्य प्रशासनाचा वेगळाच दावा | सारसबाग बंद निर्णयावरून काँग्रेसचा महापौरांवर हल्लाबोल:’भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न’ म्हणत प्रश्नचिन्ह | दिल्ली दौऱ्यात फडणवीसांची मोठी मोहीम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट:कांदा-ऊस प्रश्नावर दिलासा शक्य; मांडल्या महत्त्वाच्या मागण्या
SP News Maregaon
ठाकुरांच्या 71 मतांवर नजर:ठाणे विधानपरिषद निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा भाव वाढला; मतांसाठी भाजप-शिवसेनेची धावपळ

ठाकुरांच्या 71 मतांवर नजर:ठाणे विधानपरिषद निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा भाव वाढला; मतांसाठी भाजप-शिवसेनेची धावपळ

8 hours पूर्वी · 1 min read

auto_awesomeथोडक्यात महत्त्वाचे

राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपावरून जोरदार हालचाली सुरू असताना ठाणे विधानपरिषद मतदारसंघात वेगळंच राजकारण रंगताना दिसत आहे. ठाण्याची जागा कोणाच्या वाट्याला जाणार, यावरून भाजप आणि शिंदे गटामध्ये पडद्यामागे...

राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपावरून जोरदार हालचाली सुरू असताना ठाणे विधानपरिषद मतदारसंघात वेगळंच राजकारण रंगताना दिसत आहे. ठाण्याची जागा कोणाच्या वाट्याला जाणार, यावरून भाजप आणि शिंदे गटामध्ये पडद्यामागे मोठी चुरस सुरू असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण राजकीय समीकरणात वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडी अर्थात बविआच्या 71 मतांना मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळेच आता दोन्ही पक्षांकडून ठाकूर कुटुंबाची मनधरणी सुरू असल्याचं चित्र आहे. ठाणे विधानपरिषद निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांच्या संख्याबळानुसार भाजपची ताकद अधिक असल्याचं मानलं जात आहे. भाजपकडे सध्या 444 नगरसेवकांचं संख्याबळ असल्याची माहिती आहे. तर शिवसेनेकडे 346 मतं आहेत. या पार्श्वभूमीवर संख्याबळाच्या जोरावर भाजप सहज विजय मिळवू शकतो, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. मात्र ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जात असल्याने ही जागा पुन्हा शिवसेनेकडेच राहावी, असा आग्रह शिंदे गटाकडून धरण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीत अंतर्गत तणाव वाढल्याची चर्चा रंगली आहे. शिंदे गटाकडून विधान परिषदेसाठी रवींद्र फाटक यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. रवींद्र फाटक हे यापूर्वी विधान परिषदेचे आमदार राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी रवींद्र फाटक यांनी भाई ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. या भेटीत बविआचा पाठिंबा मिळवण्याबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून बविआच्या मतांसाठी सक्रिय हालचाली सुरू असल्याचं स्पष्ट झालं. मात्र दुसरीकडे भाजपनेही आता या निवडणुकीत आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे. स्थानिक भाजप नेत्यांनी ठाणे विधानपरिषदेवर स्वतःचा आमदार निवडून आणण्याचा निर्धार केला असल्याची चर्चा आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर नगरसेवक निवडून आणले, तर आता आमदार कधी निवडून आणायचा? असा सवाल स्थानिक भाजप नेते करत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भाजपनेही पडद्यामागून बविआशी संपर्क वाढवला आहे. भाजप खासदार हेमंत सावरा आणि आमदार राजन नाईक यांनी बविआचे माजी महापौर राजीव पाटील यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत विधान परिषद निवडणुकीसाठी पाठिंबा मागण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. बविआचं राजकीय वजन अचानक वाढलं ठाण्यातील या संपूर्ण राजकीय घडामोडींमुळे बविआचं राजकीय वजन अचानक वाढलं आहे. बविआची 71 मतं कोणाच्या बाजूला जाणार, यावर निवडणुकीचं अंतिम चित्र अवलंबून राहू शकतं. भाजपकडे संख्याबळ जास्त असलं तरी बविआची साथ मिळाल्यास शिंदे गटाचं पारडंही जड होऊ शकतं. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून ठाकूर कुटुंबाशी सातत्याने संपर्क साधला जात असल्याची माहिती आहे. आगामी काही दिवसांत या जागेवर अंतिम उमेदवार कोण असणार आणि बविआ नेमकी कोणाला साथ देणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

तुमची प्रतिक्रिया:
error: Content is protected !!