“महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक हे कोणत्याही धर्मावर अन्याय करण्यासाठी नसून, धर्मांतरणाच्या नावाखाली चालणाऱ्या कुप्रथांना आळा घालण्यासाठी आहे,” असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या विधेयकावरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी हे विधेयक सामाजिक सुरक्षिततेसाठी आणि विशेषतः महिलांच्या संरक्षणासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे ठामपणे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला स्वेच्छेने धर्मांतर करायचे असल्यास कायद्यात त्यासाठी स्पष्ट प्रक्रिया दिलेली आहे. मात्र, कुणी आमिष दाखवून, भीती घालून किंवा चुकीच्या पद्धतीने धर्मांतर करत असेल, तर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला कायद्याने शिक्षा होणे गरजेचे आहे. केवळ धर्मांतरासाठी मुलींना फूस लावून पळवून नेणे, लग्न करणे आणि नंतर त्यांना वाऱ्यावर सोडून देणे, अशा अनेक वेदनादायी घटना समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत त्या महिलांचे आणि त्यांच्या मुलांचे भविष्य अंधकारमय होते. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीच हा कायदा करण्यात आला आहे. विरोधकांकडून केवळ ‘व्होट बँक’चे राजकारण विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधकांवर हल्ला चढवताना फडणवीस म्हणाले की, “विरोधक केवळ मतांच्या लांगुलचालनासाठी या विधेयकाला विरोध करत आहेत. त्यांनी जर हे विधेयक पूर्णपणे वाचले, तर ते कधीच विरोध करणार नाहीत. महाराष्ट्र हे काही अशा प्रकारचा कायदा आणणारे पहिले राज्य नाही. यापूर्वी देशातील १० ते १२ राज्यांनी असा कायदा लागू केला असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत.” हे ही वाचा… मताची पोळी शेकण्यासाठीच धर्म स्वातंत्र्य विधेयक आणले:काही विषारी मंत्री पोसले जाताहेत, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६’ सादर करण्यात आले असून, यावर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या विधेयकावर पुढील तीन दिवस विधानसभेत चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला असून, “हे विधेयक केवळ दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करून मतांची पोळी शेकण्यासाठी आणले आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. सविस्तर वाचा…
धर्मस्वातंत्र्य विधेयकात कोणत्याही धर्मावर अन्याय नाही:विरोधकांकडून मतांच्या लांगुलचालनासाठी राजकारण, CM फडणवीसांची भूमिका
-
By सुरेश पाचभाई
- March 16, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
LPGचे उत्पादन 11 हजार मेट्रीक टनापर्यंत वाढवले:केरोसीन...
5views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 16, 2026
तारकेश्वर गडाचे महंत अदिनाथ महाराजांवर शस्त्रक्रिया यशस्वी:म्हणाले-...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 16, 2026
बायपास शस्त्रक्रियेसाठी राज्यात एकही पैसा खर्च नाही:राज्यातील...
5views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 16, 2026
घरगुती गॅससाठी आता ‘ई-केवायसी’ अनिवार्य:दुर्लक्ष केल्यास कनेक्शन...
5views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 16, 2026
स्वयंसेवी वैद्यकीय सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी सीएमई क्रेडिट...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 16, 2026
सातबहिणी डोंगरावर भाविकांवर मधमाश्यांचा हल्ला:एकाच कुटुंबातील 4...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 16, 2026
