ब्रेकिंग न्यूज
मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं
SP News Maregaon

धर्मस्वातंत्र्य विधेयकात कोणत्याही धर्मावर अन्याय नाही:विरोधकांकडून मतांच्या लांगुलचालनासाठी राजकारण, CM फडणवीसांची भूमिका

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


“महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक हे कोणत्याही धर्मावर अन्याय करण्यासाठी नसून, धर्मांतरणाच्या नावाखाली चालणाऱ्या कुप्रथांना आळा घालण्यासाठी आहे,” असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या विधेयकावरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी हे विधेयक सामाजिक सुरक्षिततेसाठी आणि विशेषतः महिलांच्या संरक्षणासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे ठामपणे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला स्वेच्छेने धर्मांतर करायचे असल्यास कायद्यात त्यासाठी स्पष्ट प्रक्रिया दिलेली आहे. मात्र, कुणी आमिष दाखवून, भीती घालून किंवा चुकीच्या पद्धतीने धर्मांतर करत असेल, तर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला कायद्याने शिक्षा होणे गरजेचे आहे. केवळ धर्मांतरासाठी मुलींना फूस लावून पळवून नेणे, लग्न करणे आणि नंतर त्यांना वाऱ्यावर सोडून देणे, अशा अनेक वेदनादायी घटना समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत त्या महिलांचे आणि त्यांच्या मुलांचे भविष्य अंधकारमय होते. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीच हा कायदा करण्यात आला आहे. विरोधकांकडून केवळ ‘व्होट बँक’चे राजकारण विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधकांवर हल्ला चढवताना फडणवीस म्हणाले की, “विरोधक केवळ मतांच्या लांगुलचालनासाठी या विधेयकाला विरोध करत आहेत. त्यांनी जर हे विधेयक पूर्णपणे वाचले, तर ते कधीच विरोध करणार नाहीत. महाराष्ट्र हे काही अशा प्रकारचा कायदा आणणारे पहिले राज्य नाही. यापूर्वी देशातील १० ते १२ राज्यांनी असा कायदा लागू केला असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत.” हे ही वाचा… मताची पोळी शेकण्यासाठीच धर्म स्वातंत्र्य विधेयक आणले:काही विषारी मंत्री पोसले जाताहेत, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६’ सादर करण्यात आले असून, यावर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या विधेयकावर पुढील तीन दिवस विधानसभेत चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला असून, “हे विधेयक केवळ दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करून मतांची पोळी शेकण्यासाठी आणले आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. सविस्तर वाचा…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर