“इफ्तार पार्टीतून सामाजिक ऐक्याचा संदेश; किरणताई देरकर यांचे मत”
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव : पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने सामाजिक एकात्मता, बंधुता आणि महिला सक्षमीकरणाचा प्रेरणादायी संदेश देणारा आगळावेगळा उपक्रम मारेगाव येथे पाहायला मिळाला. शिवसेना उबाठा पक्ष आणि एकवीरा महिला पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १४ मार्च मारेगाव येथे महिलांसाठी भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. किरणताई देरकर यांच्या पुढाकारातून पार पडलेल्या या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

रमजानच्या पवित्र वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात सामाजिक सलोखा, परस्पर आदर आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या सौ. सुनंदाताई गुहे, शिवसेना महिला तालुका प्रमुख सौ. सुरेखाताई ढेंगळे, शहर संघटिका डॉ. सपना केलोडे, सय्यदजी कूबरा जहा, आलमजी आरा, फरसजहाजी शरीफ, डॉ. यास्मिन, नगरपंचायत सदस्या अंजुम शेख, अॅड. ह्युमेरा शरीफ तसेच मुस्कान शरीफ यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमादरम्यान मुस्कान शरीफ यांनी भावपूर्ण नात पठण सादर करून रमजान महिन्याचे आध्यात्मिक महत्त्व उपस्थितांना प्रभावी शब्दांत समजावून सांगितले. त्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला एक वेगळेच भावनिक आणि आध्यात्मिक स्वरूप लाभले.
यावेळी नगरपंचायत नगरसेविका वर्षाताई किंगरे, रश्मी चौधरी, रजनीताई बोढाले तसेच एकवीरा महिला पतसंस्थेच्या सचिव सौ. माधुरी नगराळे, विद्याताई मत्ते, सुरेखाताई भेले, मंगलाताई आसेकर, रंजनाताई येरगुडे, वंदनाताई दुमोरे, प्रतिभाताई डाखरे, विद्याताई भेले, जयश्री वरारकर, लता डाखरे,ऋतुजा यांच्यासह पतसंस्थेचे कर्मचारी आणि मोठ्या संख्येने मुस्लिम महिला उपस्थित होत्या.

पवित्र रमजान महिन्यात महिलांसाठी आयोजित करण्यात आलेली ही इफ्तार पार्टी सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकात्मतेचे जिवंत उदाहरण ठरली. “जनसेवा हीच ईश्वरसेवा” हा ध्यास घेत समाजहितासाठी सुरू असलेले कार्य अधिक लोकाभिमुख होत असल्याचा आनंद किरणताई देरकर यांनी व्यक्त केला.
भविष्यातही समाजात सौहार्द, एकता आणि महिला सक्षमीकरणाला बळ देणारे असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार यावेळी आयोजकांनी व्यक्त केला.
