राज्यातील टपाल कार्यालय पासपोर्ट कार्यालय सायनॉईड विषारी वायू मिश्रीत आरडीएक्स बॉम्बचा स्फोट होणार असल्याचा ईमेल बुधवारी (ता. 25) टपाल कार्यालयास प्राप्त झाला असून त्यामुळे बहुतांश ठिकाणी टपाल कार्यालयातील कामकाज बंद करून तपासणीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. सदर ईमेल कोणत्या भागातून आला याचीही पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील टपाल कार्यालयांना आज ईमेल प्राप्त झाला आहे. ‘तुमच्या राज्यातील सर्व पासपोर्ट व टपाल कार्यालयात दुपारी बारा वाजून 10 मिनीटांनी सायनाईड विषारी वायू मिश्रीत 16 आरडीएक्स बॉम्बचा स्फोट होणार आहे. सर्वांना तातडीने बाहेर काढा’, असे या ईमेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. या ईमेलमुळे राज्यातील बहुतांश टपाल कार्यालयातून एकच खळबळ उडाली आहे. या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली असून काही ठिकाणी पोलिसांकडून तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने पासपोर्ट कार्यालयाची बाँम्ब शोध व नाशक पथकाकडून तपासणी केली जात असून तसेच पार्सलचे बॉक्स तपासले जात आहेत. राज्यभरात तपासणी सुरु असल्याचे हिंगोलीचे पोस्टमास्तर एस. एस. निर्मल यांनी सांगितले. हिंगोली कार्यालयाला माहिती मिळताच पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, पोलिस निरीक्षक संदीप मोदे, जमादार अशोक धामणे, शेख मुजीब, संतोष करे, गणेश लेकुळे, गणेश वाबळे, संजय मार्के यांच्यासह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी पोस्ट ऑफीस परिसरात बॅांम्ब शोधक व नाशक पथकाकडून तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर ई मेल कोणत्या ठिकाणावरून आला याची चौकशी केली जात आहे. हिंगोलीच्या नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी केले आहे.
राज्यातील टपाल अन् पासपोर्ट कार्यालये बॉम्बने उडवण्याची धमकी:सायनाईड मिश्रित आरडीएक्स असल्याच्या ईमेलने खळबळ, यंत्रणा सतर्क
-
By सुरेश पाचभाई
- March 25, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे अनावरण:देशव्यापी स्पर्धेतून निवड;...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 13, 2026
काँग्रेसच्या काळात राहुल गांधींना प्रभावी नेतृत्व दाखवता...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 13, 2026
तटकरे – पवारांच्या भेटीवर राजकीय वावड्या:चर्चा रंगवण्यात...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 13, 2026
महाराष्ट्रात जिहाद कराल तर ‘देवाभाऊंचा’ बुलडोझर चालणारच:जलील...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 13, 2026
